नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . .









सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद अन् नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू या!!!

सर्व वाचकांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. . .आपली सर्व स्वप्न, आशा , आकांशा पूर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना!!!!

वरील शुभेच्छा पत्र "भुंगाच्या" ब्लॉगावरून घेतल आहे. भुंगाचे हार्दिक आभार!!!

विकेट पडली!!!!!

2009 मधील सर्वात अविस्मरणीय घटना म्हणजे माझी विकेट पडली. नाही समजलात अहो जिच्या शोधात जे काही भन्नाट कांदे पोहे पचवले ती अखेरीस सापडली.दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आमची विकेट पडली अन् ती ही अगदी नाट्यमयरीत्या. तशी ही पोस्ट मी त्या दरम्यानच करणार होतो पण म्हणल एवढी महत्वाची ही घटना वर्षाअखेरीस ब्लॉगवर टाकु या. (महेन्द्र काका कस वाटल ब्लॉग न लिहीण्याच कारण ?? :) )

दिवाळी ला समस्त कामगार वर्ग सुट्टी ला गेल्यामुळे स्लॅबवर पाणी मारण्याच काम माझ्याकडे आल होत. दिवाळी पाडाव्याच्यादिवशी अभ्यंग स्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी मी साईटवर पोहचलो, तोच ताई चा फोन आला " तू तिथेच थांब तुला घ्यायला माई (माझी मोठी बहीण)व जीजु येत आहेत अन् त्याच्यासोबत तुला मुलगी पाहायला जायचाय."मी काही प्रतिक्रिया देइपर्यंत पुढील वाक्य अस बाबानी सांगितलय. बस तीर्थरुपांचा आदेश म्हणल्यावर काय बोलणार आम्ही??? बाबा कुठे आहेत विचारल तर ते पुढे गेलेत तुम्हाला ते तिथेच भेटतील. . .आता मात्र जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

स्लॅबवर पाणी मारायला आलो असलो तरी पण योगा योगाने जरा ठीक ड्रेस होता त्यामुळे अवतार जरा बरा होता.थोड्याच वेळात जीजू आले अन् आम्ही निघालो. साइटपासुन साधारण 15 की.मी. वर तीच गाव होत. आम्ही तिथे जाण्यागोदर रस्त्यात बाबा अन् काका ( ज्यानी हे स्थळ सुचवल ते ) हे भेटले, त्यांच्याकडुन समजल की अजुन अर्धा तास थांबाव लागेल कारण तिथे अगोदरच दुसरे पाहुणे पाहण्यासाठी आलेले होते. थोड्या मिस कम्युनिकेशन मुळे हा गोंधळ झाला होता.त्यांना पण खूप चुकीच वाटत होत पण ते तरी करणार काय?? ते पाहुणे गेले की सांगा मग आम्ही येतो अस सांगुन आम्ही आमच्या परीचयाचे एक स्नेही तिथे जवळच राहतात तिकडे गेलो.

बाबा थोडे बाजूला जाताच ,आमचा मराठी बाणा जागा झाला. माई जवळ थोडासा राग म्हणजे निषेध व्यक्त केला (कसा केला असेल ते समजून घ्या). मी जातो, तुम्ही बघून घ्या, माझा मूड गेलाय, मी नकारच देणार ई.ई. . . .अस माझ चालू होत तोच आमचे तीर्थरुप आले फक्त त्यांनी माझ्याकडे पाहील अन् विचारल काय झाल काही अडचण आहे का?? थोडा समजूतदारपणा दाखव. . .बस्स संपल पुन्हा एकदा बोलती बंद, ढान्या वाघाच मांजर झाल होत!!!

तब्बल पाउन तासाने त्यांचा फोन आला मग आम्ही निघालो. तो पर्यंत ब्लॉगवर यावर काय खरडायच याचाच विचार करत होतो.ह्या मुलीला नकार द्यायचा असा दृढ निश्चय करून निघालो. फक्त केलाच नाही तर तो माई अन् जीजू जवळ बोलून पण दाखवला.

शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोहचलो माझा मूड नसल्यामुळे मी अगदी शांत होतो. सुरुवातीला कश्यामुळे गोंधळ झाला, तसदीबद्दल क्षमस्व,आमची ओळख परेड इ. झाल. त्यानंतर मग मुलीला बोलवल. . .आलोच आहे तर बघू या. . . .अश्या प्रामाणिक हेतूने एक चोरटा कटाक्ष टाकला. . बस्स काय झाल माहीत नाही लेकीन आपून के दिल की घंटी बजी!!!
मनातून अस वाटल यार हीच ती!! जिला आपण शोधतोय ती हीच. . .(आता झाली का गोची!!! :)) आयुष्यात पहिल्यांदा अस फिलींग आल होत.

बाबा अन् जीजू यांनी थोडे प्रश्न विचारले, आता वेळ होती माझी. . .मी काय विचारू?? अगदी भोळा भाव दाखवून मी म्हणालो ( मनातून तर मला फक्त तिच्याशीच बोलायच होत) शेवटी तुम्ही दोघे बोला आम्ही सगळे बाहेर जातो अस सांगुन सर्व जण बाहेर पडले. . मनातून तर लाडू फुटत होते. . चला आता बोलता येईल अस वाटल. . . पण हा आनंद फार काळ नाही टिकला. . कारण तिचा भाउ अन् तिचे काका हे समोरच येऊन बसले अन् त्यानंतर ही आली.

आता काय बोलणार?? तिच्याशी बोलण्याअगोदरच बंधुराज सुरू झाले काय करता, डिग्री कुठे झाली. कॅड मॅनेजर आहे म्हणल्यावर मग आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या.तिच्याशी फक्त एकदाच बोललो. साधारण 15-20 मिनिटानी आमच्या गप्पा संपल्या अन् ते ही तिच्याशी काही न बोलता.

आम्ही बाहेर पडताना माझा दृढ निश्चय अगदी कोलमडून पडला होता. बाबा, माई, जीजू गालातल्या गालात हसत होते कारण आता त्यांना मी सापडलो होतो.निघाल्यानंतर थोड्यावेळाने तीर्थरुप म्हणाले तर मग काय नकार कळवुन टाकतो. तू तर तेच ठरवल होत ना?? यावर मी शांत झालो खाली मान खालून आपला गप्प बसलो. . .काही बोलाव म्हणून वर पाहील तर सगळेजण हसत होते. . . माझी विकेट पडली होती!!!

साधारण 2 दिवसांनी त्यांचा पण पसंतीचा फोन आला. त्याच वीक मध्ये मला कैरोला निघायच होत त्यामुळे माझी गडबड होती म्हणून तुम्ही बोलणी करून घ्या फक्त फायनल निर्णय होण्यापूर्वी मला मुली ला भेटायचाय, त्यानंतरच आपला निर्णय द्या अस मी बाबांना सांगुन दिल.

मला कैरो ला लगेच जायच होत त्यामुळे भेटायच कस हा प्रश्न होता कारण ती मुंबईत मी पुण्यात . . . भेटणार कस?? सुट्टी मिळणं पण अवघड. ह्या सगळ्यात शेवटी जाताना विमानतळावर भेटू या अस ठरवल.

माझी सकाळी 9.00 ची फ्लाईट होती त्यामुळे पुण्याहून मी रात्रीच निघणार होतो. पहाटे 5.30 ला भेटू या अस नक्की झाल. ठरल्याप्रमाणे मी 5.30 मी टर्मिनल 2 ला पोहचलो. पण अजुन ही लोक काही पोहचली नव्हती. एकटी येते की सारा परीवार घेऊन येते, काय बोलू, काय विचारू,वेळेवर येईल का?? खूप सारे प्रश्न मनात येत होते.

शेवटी 5.45 ला तिचा भाउ अन् ती आले अन् मी सुटकेचा निश्वास सोडला. चला आता तरी किमान मी बोलू शकेन अस वाटत होत. पण बाहेर उभ राहून कस बोलणार ?? म्हणून मी चेक इन करून तर ही दुसर्‍या गेट ने अरायव्हल ला येईल मग तिथे बोलू या अस सांगुन मी अरायवलला गेलो. तिथे जाउन पाहतो तर काय. . .तिथे मध्ये बॅरीकेड होत त्यामुळे. मी टर्मीनल 2 मधून अरायवल ला जाउ शकत नव्हतो. झाल पुन्हा एकदा पोपट!!!

ती पलीकडे अन् मी अलीकडे अश्याच आम्ही गप्पा मारल्या. अन् त्या बॅरीकेडच्या साक्षीणेच मी तिला लग्नासाठी विचारल.
आमच्या दोघांचा पण निर्णय झाला. तेवढ्यात तिचा भाउ सॅण्डविच घेऊन आला ते खाउन आम्ही निरोप घेतला.लगेच बाबांना फोन करून निर्णय देऊन टाकला. अन् त्यांनतर 2 आठवाड्याने आमच लग्न नक्की झाल.

त्या दिवशी निघताना मी संदीप खरेचं " हे भलते अवघड असते. . . . " हे गान मी फील करत होतो. मुंबई विमानतळावरील तो अरायवल सेक्शन आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही.

हे कशे योगा योग असतात ना??? पाहा. . . मी नकार द्यायचा अस ठरवून गेलो होतो त्या मुलीलाच होकार दिला.अन् सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, "मी मुंबईच्या मुलीशी कोणत्याही परीस्थीतीत लग्न करणार नाही अस ठरवल होत पण शेवटी मला मुंबईचीच मुलगी मिळाली." (समस्त मुंबईकर मुलींची माफी मागून. . .होणारी बायकोसुद्धा आली त्यात!!)

चला अजुन 5 महिने तरी बॅचलर लाइफ जगून घेतो.!!!

पोरका...

सध्या कैरोमध्ये पुन्हा मी हॉस्टेल लाइफ अनुभवतोय.सध्या कामाचा ताण तसा कमीच आहे. त्यामुळे फिरणं भरपूर चालू आहे.हॉस्टेलला जसा ग्रूप करून मस्ती करायचो तेच सध्या आम्ही करतोय.आज जी पोस्ट करतोय ती आमच्या मस्तीवर किंवा फिरण्यावर नाही तर थोडी वेगळी आहे.

खुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का झाला असेल?? अशी कोणती परिस्थिती याने अनुभवली असेल की ज्यामुळे याचा स्वभाव असा झाला.माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.

आमच्या कंपनीत असाच एक आर्किटेक्ट मित्र आहे की जो कोणतीही गोष्ट करताना अगोदर पैश्याचा विचार करतो. मग तुम्ही ते भाजी खरेदी जा किंवा कोठे फिरायला जायचा प्लान करा.याला विचारायच म्हणजे याचा नेहमीचा प्रश्न किती पैसे लागतील??अन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्न!! कारण ग्रूप मध्ये एकट्याला सोडून जाणं. पण बुद्धीला पटत नाही. तसा त्याला पगारपाणी पण चागला.राहणीमान पण टापटीप.अस सार असताना हा असा का वागतो याच कोड आम्हाला सगळ्याना असायच.

काल रात्री कार्यालायातच आमचा गप्पाचा फड जमला होता. आमच्या ह्या मित्राचा प्रेम विवाह त्यामुळे आम्ही त्याला त्याची प्रेम कहाणी विचारली.कुठे भेटलास, कोणी प्रपोज केल ई. नेहमीचे साचेबद्ध प्रश्न. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्याची कहाणीच आमच्या पुढे ठेवली.अन् ते ऐकून आम्ही सारे स्तब्ध झालो.

माझा हा मित्र अन् त्याचा भाउ हा एवढाच याचा परीवार. याची आई लहानपणीच वारली. अन् हा 12वीला असताना याचे वडील वारले. अश्या या अनाथ भावाडांना त्याच्या दूरच्या मामाने आसरा दिला. दोघांमध्ये हा थोरला असल्याने आता लहान भाउ, स्वतःच शिक्षण, भावाच शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी याच्यावर आली.

याने पार्ट टाइम जॉब करत बी.आर्क पूर्ण केल तर भावाला कॉम्प्यूटर इंजिनीअर केल. हे सार करताना परीस्थीतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. ह्या जगात आई बापाच छ्त्र हरवाल्यानंतर जगणं किती कठीण असत हेच त्याने अनुभवल.
त्याच्या महाविद्यालयीन मैत्रीणी बरोबरच याने लग्न केल. हा महाराष्ट्रीयन तर ती उत्तर प्रदेशची.त्यावेळी लग्न करायाच म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न होता बोलणी करणार कोण?? हा तर सगळ्यात मोठा अन् भाउ तर तेव्हा शिकत होता.जवळच अस कोणीच नाही.
शेवटी मनाच धाडस करून हा अन् याचा लहान भाउ अशे दोघेच जण लखनौला तिच्या घरी गेले. तोपर्यात तिने सुद्धा घरी या सगळ्याची पूर्व कल्पना दिली होती. नशीबाने , याला पाहिल्यानंतर तिच्या घरून काहीच विरोध झाला नाही. यानंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्यासाठी मोठ कोणी तरी असाव म्हणून तो याच्या दूरच्या त्या मामाला घेऊन आला अन् मग याच लग्न झाल.
नुकताच त्याने अन् त्याच्या भावाने मिळून पुण्यात फ्लॅट घेतलाय. 3-4 महिन्यापुर्वीच त्याला मुलगा झालाय.त्याच घर चालत ते फक्त पगारावर.

हे सार ऐकल्यावर मला तरी वाटल की अरे यार जर एवढ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस असेल तर तो जे काही वागतो ते माझ्या मते तरी योग्यच आहे. प्रत्येक वेळी जर खर्च करताना तो पैश्याचा विचार करत असेल तर त्यात गैर अस काहीच नाही.कारण शेवटी त्याला शून्यातून विश्व निर्माण करायाच आहे अन् ते ही कोणाच्याही आधाराशिवाय!!!

आज ही जेव्हा जेव्हा मला खूप बोअर होत किवा खूप टेन्शन येत तेव्हा मी माझ्या बाबांशी बोलतो.त्यांच्याशी बोलल की खूप बर वाटत. आई बाबा आहेत ही भावना जे सुख देते, ते सुख तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही.

मी स्वतः माझ्या आई बाबं शिवाय?? . . .याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्याकडे काही नसल तरी चालेल पण आई वडीलाच छत्र हे आपल्या डोक्यावर असायलाच हव!!!

पांगिरा- विश्वास पाटील



कालच विश्वास पाटील यांची "पांगिरा" कांदबरी वाचून झाली. पांगिरा अन् डोंगरवाडी या दोन गावांची ही कहाणी.
यात पांगिरा गाव हे नायक अन् त्याभोवतीच सारी कांदबरी फिरते.

पांगिरा दुसर तिसर काही नसून ही काळ्या मातीची कर्मकथा आहे.निसर्गाच वरदान लाभलेल पांगिरा हे गाव.
मुबलक पाणी, कसदार काळीभोर जमीन. सगळी बागायती.फक्त उसाची भक्कम शेती करणार हे गाव. उसाच्या शेती बरोबरच गावाची श्रीमंती वाढली, माडीची घर, गाड्या,ट्रक्टर, हॉटेल हे सार काही आल. तालुक्यात गावाची पत वाढली.आतापांगिरा हे महत्वाच सत्ता केंद्र झाल.

गावाने कात टाकायला सुरूवात केली. नवनवीन याओजणा अं सुख सुविधा गावात यायला लागल्या. गावात वीज आली तास उसाची शेती वाढली, अमाप पाणी उपसा होऊ लागला.नंतर दूध डेअरी आली.

आता हा गावगाडा चालवायचा म्हणजे गावाचा कारभारी आलाच अन् जिथे सत्ताधारी आले तिथे विरोधक आलेच.
मग सुरू होतो सत्तेचा खेळ. राजकारणाच्या पटलावर आपल वर्चस्व सिद्ध करण्याचा एक खेळ. मग त्यात वाटेल ते करण्याची तयारी.

या गावातील प्रत्येकाला एक धुंधी आहे अन् त्यातच ते सारे जण जगत आहेत. "सार्‍या जगाला दुष्काळ पण पांगिरा सुकाळ" असा यांचा भ्रम. याटक पाण्याचा अमाप उपसा, वृक्षतोड, हे सार काही चालू आहे. सिदुबा अन् यमाई या दोन देवांच्या श्रद्धेवर हा गाव चालतो.त्याला कोंबड कापल की सगळे गुन्हे माफ. या अश्या वागण्यातच त्यांचा उद्याचा विनाश आहे अस कोणी सांगितल तर त्याला हे वेड ठरवणार.

तर असा हा गाव आता पुढे काय होत हे वाचण्यात मजा आहे.विश्वास पाटील यांनी सध्याच वास्तव लिहल आहे. पारंपारीक खेड अन् आधुनिक सुधारणावादी खेड यातील स्थित्यंतर अचूक लिहल आहे.

नव्या व्यवस्थेते जिल्हा परीषद, पंचायत समीती आल्या.बलुतेदारी गेली, जाती व्यवस्था निकालात निघाली, कूळ कायदे गेले. पंचाच्या साक्षीने चालणारा गाव गाडा ढासळला. पाटील,कुलकर्णी गेले अन् तलाठी, ग्रामसेवक अशे नवे बलुते आले. आमदारकी, जिल्हा परीषद, ग्राम पंचायत अश्या प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा पट खेळला जाउ लागला. अन् त्यातून सुरू झाला एक आपल्याच विनाशाचा खेळ.

हे सार या पुस्तकात आहे. एका सर्व संपन्न गावाकडून दुष्काळी गाव अश्या या स्थित्यंतराच वर्णन यात आहे. विश्वास पाटील यांनी उभा केलेला "पांगिरा" हा सामाजिक भान हरवलेल्या सध्याच्या खेड्याच प्रतिनिधीत्व करतो.

या कादंबरीतील मुरार पाटील ही व्यक्तीरेखा मला खूप भावली. करारी पण तितकाच हळवा. जिद्दीवर आपल्या मुलाला वकील करणारा.परंपरेबरोबरच आधुनिकतेची कास धरणारा. मुरार पाटील अन् त्याची बायको राधाई ह्या दोघांमधील प्रसंग खूप भाव स्पर्शी आहेत.विश्वास पाटील यांच्या लेखणी ने अत्यंत ताकतीने ते आपल्यासमोर उभे केले आहेत.

एकदा तरी जरूर वाचावी अशी ही कांदबरी आहे.

उद्ध्वस्त खेडी, वैराण राणे
पाण्याचा गैर वापर, दुष्काळाचे गाणे
टपोर्या कणसारखी मातीतली माणसे
आधुनिकीकरण, सहकार अन् लोकशाहीचा फेरा
गावाच्या काळ्या - पांगिरा एका तपाचे तीन तेरा
हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा!!!

खरी कमाई!!!

2 दिवसांपुर्वी भानस यांच्या ब्लॉगवर "खरी कमाई" ही पोस्ट वाचली अन् त्यावरून ही पोस्ट लिहतोय.

गेले 2 महिने मी प्रोजेक्टसाठी कैरोला आहे, ताई पुण्यात अं आई बाबा दोघे पण गावी आहेत.
बाबांना गुरुवारी संध्याकाळी अचानक चक्कर आली, त्यामुळे आई ने लगेच घराशेजारील दवाखान्यात नेल. चेक अप केल्यानंतर लक्षात आल की त्यांचा बी.पी लो आहे व हृदयाचे ठोके पण कमी झालेत अन् त्यात त्यांना हृदयविकाराचा त्रास त्यामुळे त्वरीत मोठ्या हॉस्पीटल ला नेणं गरजेच होत. कारण हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता होती. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर ताई त्यांना चेक अप ला पुण्यात घेऊन आली.

शनीवारी पुण्यातील डॉ. हिरेमठ यांच्याकडे चेक अप केल्यावर त्यांनी त्वरीत ऐंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला.
यासाठी साधारण 2 .25 लाख खर्च होणार होता अन् थोडी रक्कम अगोदर भरावी लागणार होती. त्या क्षणी ताइने मला फोन करून कळवलं. आता माझ्यापुढे प्रश्न होता तो फक्त पैश्यांचा. शनिवार असल्यामुळे मला ट्रान्सफर पण करता येणार नव्हते.

मी विचारात होतो अन् मनात नकळत स्वांमी समर्थांचा जप करत होतो, तेवढ्यात सच्याचा मेसेज आला. (सच्या माझा एकदम जिवलग मित्रा आम्ही इंजिनिअरिंगचे पासूनचे मित्र.) " तू काळजी करू नकोस मी आहे."त्याच्या फक्त एका मेसेजाने मला खूप रिलीफ मिळाला.
त्यानंतर त्याने अवघ्या तासात 1,60,000 जमा केले. आमच्या सगळ्या ग्रुपने अगदी क्षणाचाही विचार न करता आप आपली खाती रिकामी केली.त्यात रोहिणी म्हणून माझ्या मैत्रीणीची मैत्रीण तिने पण मदत केली,की जिला फक्त 1 ते 2 वेळा भेटलो असेल.

या नंतरच्या भावना व्यक्त करण्यासाठी खर तर माझ्याकडे शब्दच नाहे आहेत. खर सांगायच तर या भावना शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही.

पण फक्त एवढच नाही तर प्लास्टी होऊन डिस्चार्ज होइपर्यंत सगळेजण आई अन् ताई सोबत थांबले होते. या दरम्यान आई किंवा ताई यांना कधीच मी त्यांच्यासोबत नाही अस वाटल नाही इतका सारा आधार या सर्वांनी दिला.

मी यासाठी माझ्या मित्रांना धन्यवाद म्हणणार नाही किंवा हे उपकार आहेत अस पण म्हणणार नाही. मी म्हणेन ही फक्त मैत्री आहे अन् ही मैत्री आयुष्यभर अशीच असावी.

अन् सगळ्यात महत्वाच म्हणजे डॉ. हिरेमठ, बाबांचे ब्लॉकेज जास्त होते म्हणून ताई ला वाटत होत की आता बहुतेक बायपास करावी लागेल पण त्यांनी ऐंजिओप्लास्टी करा असा सल्ला दिला.
जेव्हा त्यांना समजल की भारताबाहेर आहे अन् ताई व आई शिवाय घरातील दुसर कोणी नाही तेव्हा त्यांनी आपुलकीने पैसे कसे जमा करणार, काही अडचण आहे का?? चौकशी केली.त्या क्षणी त्यांनी डॉक्टर म्हणून दिलेला आधार ताई व आई ला मानसिक बळ देऊन गेला

मला वाटत मी कधीही न पाहिलेले डॉ. हिरेमठ , 1-2 वेळाच भेटलेली रोहिणी किंवा आमच्या ग्रुपची मैत्री हीच खरी कमाई आहे!!!

बाबा कदम - भावपुर्ण श्रद्धांजली!!!!




बाबा कदम यांच निधन झाल. . .मराठी साहित्यविश्वातील एक तारा निखळला. . . . त्यांची लिखाण शैली अशी काही होती की अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली होती. . .त्यांची कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती पूर्ण होइपर्यंत चैन पडत नाही. मला आवडलेल्या त्यांच्या काही कादंबरी अन् कथा संग्रह : डार्करूम, भालू,बालंट, बिनधास्त, मानसकन्या. अजुन आहेत पण आता आठवत नाही.

अश्या या प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखकास भावपुर्ण श्रद्धांजली!!!!!

बाबा कदम यांचे छायाचित्र मराठीमाती वरुन साभार!!!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!




-------------------------------------------------------------------------------------

सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

चला परीवर्तन घडवू या!!!!




उद्या मतदान . . .चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!!

"अभी नाही तो कभी नाही" हे विसरू नका.


"मतदान करताना ते व्यक्ती सापेक्ष करा"


" लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लायाकी नसलेल्या लोकांना पाठवू नका"


" स्वच्छ, प्रामाणिक अन् सुशिक्षित व्यक्तीलाच आपल अमुल्य मत द्या"


"व्यवस्था अन् सरकार म्हणजे आपणच आहोत. . त्यामुळे अकार्यक्षम अन् भ्रष्ट व्यवस्थेचा आपण स्वीकार करणार नाही हे दाखवून द्या"


" आजपर्यंत तुम्हाला गृहीत धरून ज्यांनी गाळीच्छ राजकारण केल आहे त्यांना लायकी दाखवून द्या"


"भ्रष्ट व्यवस्था अन् निष्क्रीय नेते यांच्याविषयी जो राग आहे तो आता तरी मतातुन बाहेर येऊ द्या"


दुसर कोणासाठी नाही तर आपल्या भविष्या साठी, आपल्या देशासाठी. . एका सक्षम राष्ट्राच्या उभारणी साठी मतदान करा


चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!! आपल मतदानाच कर्तव्य निभाऊ या!!!

मुशरफ को एक ही मारा लेकिन सॉलिड मारा!!!

आताच यु ट्युवबर वीडीओ पाहिला . . .खाली पोस्ट करतोय!!!!!

मानल राव मौलाना मदानी यांना. . एवढ बोलायला पण गट्स पाहिजे. . .सिंपली ग्रेट. . .

आयुष्यभर मुशरफ विसरणार नाही!!!

त्याला स्वप्नात पण मौलाना मदानी दिसत असेल आता!!!!

प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला भारताकडून असाच धोबी पछाड मिळत राहणार आहे!!!!


आई!!!


------------------------------------------------------------------------------------

A Mother's Kiss  [123/365]

लग्नानंतर २१ वर्षांनंतर माझ्या पत्नीने दुसर्‍या एका स्त्री बरोबर जेवायला व नंतर सिनेमाला जाव अस सुचवल। "माझ तुमच्यावर प्रेम आहेच पण मला माहीत आहे की त्या दुसर्‍या स्त्रीचेही तुमच्यावर फार प्रेम आहे आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल." पत्नीने सुचवलेली टी 'दुसरी स्त्री' म्हणजे "माझी आई"!!! १९ वर्षांपुर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती आणि माझा संसार, मुळे आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो.

मी आईला फोन केला " आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाउ या." मी म्हणालो.'काय झाल रे??? तुझी तब्येत तर ठीक आहे ना??' - आई.
रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षित आमंत्रण आले म्हणजे काही तरी अशुभ घडणार असा तिच्या मनाचा ठाम ग्रह होता.
"आपण खूप दिवसात भेटलेलो नाही.जरा छान मजेत वेळ घालवू या अस वाटल. फक्त आपण दोघेच!! तिसरे कोणी नाही." मी म्हणालो. त्या शुक्रवारी काम संपल्यावर मी तिला पीक अप करण्यासाठी तिच्या घरी गेलो तेव्हा मी जरा नर्व्हसच झालो होतो. तीही थोडी नर्व्हस असावीशी वाटली. कपडे करून दारतच ती माझी वाट बघत उभी होती. लग्नाच्या शेवटच्या वाढदिवसाला बाबांनी भेट दिलेला ड्रेस तिने घातला होता. मला बघताच तिचे डोळे आनंदाने चमकले.
'आज मी माझ्या मुलाबरोबर बाहेर जाणार आहे' अस मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोनवर सांगितल्यावर त्यांना माझा इतका हेवा वाटला म्हणून सांगु!' आई म्हणाली.
आम्ही एका बर्‍यापैकी हॉटेलात गेलो. टेबलपाशी बसाल्यावर मी तिला मेन्यु वाचून दाखवू लागलो. बरेच आयटम वाचून झाल्या वर मी मान वर केली तर ती प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे ट्क लावूंन बघत होती.
" तू लहान होतास तेव्हा मी तुला मेन्यु वाचून दाखवायची" ती म्हणाली.
जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या.विशेष असे काही नाही पण एकमेकांच्या आयुष्यात नुकतेच बारीकसारीक काय घडले ते एकमेकांना सांगितले एवढेच. पण गप्पांमध्ये एवढे रंगलो की सिनेमाची वेळ सरुन गेल्याचही लक्षात आल नाही. नंतर मी तिला सोडायला गेलो तेव्हा निरोप देताना ती म्हणाली "आता पुढच्या वेळेस मी तुला जेवायला घेऊन जाईन"
"ओ.के." मी म्हणालो
त्यानंतर आई हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेली. मी तिच्या घरी तिचे सामान आवारायला म्हणून गेलो तेव्हा हॉलमधील टेबलावर तिच्या हस्ताक्षारात माझे नाव लिहलेले एक पाकिट दिसले. त्यात आम्ही दोघे शेवटी ज्या हॉटेलात जेवायला गेलो होतो त्याची एक पावती अन् एक चिठ्ठी होती.
चिठ्ठीत लिहाले होते "आपण दोघे ज्या हॉटेलात गेलो होतो त्या हॉटेलात मी दोघांचे पैसे भरून ठेवले आहेत मला येता येईल की नाही याची खात्री नव्हती पण तू आणि कविता (माझी पत्नी) अवश्य जा. त्या दियावशी तू मला घेऊन गेलास त्याचा मला किती आनंद झाला हे मला शब्दात सांगता नाही येणार. माझ्यावर तुझा खूप जीव आहे रे!! देव तुला सुखी ठेवो!! आय लव्ह यु!!!!" माझ्या गळ्यात हुंदका दाटुन आला.
त्या क्षणी मला "आय लव्ह यु" हे आपल्या आवडत्या माणसांना शब्दांनी सांगण्याचे व त्यांच्यासाठी वेळ काढण्याचे महत्व कळाले.
जीवनात तुमच्या प्रिय व्यक्ती इतके महत्वाचे दुसरे काही असु शकत नाही। त्यांच्यासाठी वेळ काढा - - विशेषत: आई वडीलांसाठी!!!!!
-------------------------------------------------------------------------------------
आता महत्वाच : वरील लेख मला आज मेल मधून आलेला आहे। मनाला भावला. . .अन् आई वडील या विषयावर होता (की जो आपला वीक प्वाईंट आहे.) त्या मुळे पोस्ट करीत आहे. की बोर्ड बडवन्याव्यतरिक्त आमचे कोणतेही कष्ट नाही याची नोंद घ्यावी नंतर डोक्याला शॉट नको कॉपी राईटचा!!!!

या लेखामागील भावना समजून घ्या फक्त. . .उगाचच जास्त काम ना करता थोडा स्वतः ला वेळ द्या!!!

व्हेज पुलाव आठवणीतला!!!!

माझ खाण्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.तसा मी शुद्ध शाकाहारी पण हाडाचा खादाडी आहे. व्हेज मध्ये निरनिराळे प्रकार नेहमीच ट्राय करत असतो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर पुण्याच मेसच जेवण काही आमच्या पचनी पडायच नाही. शेवटी मी अन् आमचे परममित्र जोगळेकर ( की जो अट्टल मांसाहारी. . .फक्त नावात "कर" आहे) आम्ही रुमवरच जेवण तयार करायाच अस ठरवल. त्यानंतर मात्र मग रोज नाना प्रकार करून खाउ लागलो. नवीन नोकरी असल्यामुळे रोज यायला उशीर. . .त्यानंतर आमचा स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी, कोशिंबीर करायचो पोळ्या मात्र बाहेरून आणायचो.
एक दिवस व्हेज पुलाव करायचा असा बेत झाला. . .जोगळ्याने फोन करून नेहमीप्रमाणे सारी साधन सामग्री आणायला सांगितली. सुरुवातीला आम्ही कर्वे नगराला रूम राहत होतो त्यामुळे ताज्या भाज्या लगेच मिळून जायच्या. त्या दिवशी जोगळ्या येई पर्यंत सारी तयारी करून ठेवली. तो आल्यावरच पुलाव करू म्हणजे मग गरमा गरम हाणता येईल हा हेतू. . . ( खर कारण म्हणजे एकदा पुलाव झाला असता तर त्याची वाट बघत कोण बसल असत???? त्या अगोदरच सगळा सुपडा साफ झाला असता. . म्हणून वाट पाहायची) . . .त्या दिवशी नेमक त्याला यायला ११.०० वाजले.. . आम्ही तो पर्यंत कच्च्या भाज्यांवर आडवा हात आणला त्यामुळे भूक बर्‍यापैकी कंट्रोल मध्ये होती.
रात्री ११.०० नंतर मग आमचा पुलाव गॅसवर चढला. . . त्यानंतर मात्र मग पोटातील कावळ्यांनी चांगलीच बोंब मारायला सुरूवात केली. . . . कधी पुलाव शिजतोय यावरच सारख लक्ष होत.. . .५ मिनिट सुद्धा युगासारखे वाटत होते. . .तोच आमच्या गॅसने अर्धवट पुलाव झाल्या नंतर जीव सोडला. . . .वेळ रात्रीचे ११.४५-१२.०० ची पुलाव अर्धवट . . .जोराची भूक लागली होती. . .आता करायच काय??? पुलाव शिजवायचा कसा?? मोठा यक्ष प्रश्न. शेजारच्या काकू पण झोपल्या होत्या. . . भुके मुळे डोक पण चालेनास झाल होत. तोच आमच्या दोघांची नजर पेपरच्या रद्दीवर गेली. . .दोघांनाही न सांगताच मार्ग सापड्ला होता. . .गरज होती ती फक्त ३ दगडांची. . . आमची रूम साधीच होती त्यामुळे फरशी खराब झाली तरी साफ करता येऊ शकत होती. . . बाहेरून बाजूच्या पडलेल्या कंपाउंड वॉल चे दगड घेऊन आलो.मस्त पैकी ३ दगडांची चूल केली अन् सरपण म्हणून पेपरची रद्दी होतीच. . . .सारी रद्दी जाळून कसा बसा पुलाव आम्ही शिजवला. . . पण आता नवीनच प्रश्न आला होता. . रद्दीमुळे सगळी कडे प्रचंड धूर झाला होता. . त्यामुळे मागील बाजूची खिडकी उघडली. . त्याच्या वासाने वरच्या मजल्यावर राहणारे मालक जागे झाले. . .आता मात्र आमची वाट लागली होती. . काकांना समजल तर चंबु गबालं आवरून निघाव लागल असत. . शेवटी डोक चालवल सर्व लाइट बंद करून बाहेर निवांत गप्पा मारत बसलो. . .अंदाजाप्रमाने काका खाली आलेच. . त्यांना कस तरी कट्वल. . .नशीब ते लवक्र गेले. . त्यांना वाट्ल की मागील बाजुकडील कोणीतरी कचरा पेट्वतय त्यामुळे ते निघून गेले अन् हे पटवून द्यायला आमच्यासारखे अत्यंत विश्वासू भाडेकरू होतेच. . . . जाताना लाइट बंद करून झोपा हे सांगायला ते विसरले नाही. .आता आम्ही लाइट पण चालू ठेवू शकत नव्हतो. . .लाइट चालू राहिली तर काका परत खाली यायला बसले. . .आता जेवायच कस??? नशीबाने १ मेणबत्ती सापडली. . .मग काय. . .मेणबत्तीच्या प्रकाशात रद्दीवर शिजवलेल्या पुलावावर आडवा हात मारत होतो. . ते झाल्या नंतर जळालेल्या रद्दीची योग्य ती वाट लावली.. . पण खराब झालेली फरशी साफ करताना मात्र वाट लागली होती.
तर अस हे आमच कॅन्ड्ल लाइट डिनर झाल होत!!!! अशी डेट पुन्हा होणे नाही. . . बाकी पुलाव एकदम झॅक झाला होता बगा!!!!

कोन्ट्रसेपटिव पिल्स :असाही साइड इफेक्ट!!!

काही दिवसांपुर्वी बहुतेक महेंद्रजींच्या ब्लॉगवर कोन्ट्रसेपटिव पिल्स वरील एक पोस्ट वाचनात आली होती. या जाहिरातिंचा सध्या कोणत्याही चॅनेलवर जो काही भडीमार चालू आहे त्याचा लहान मुलांवर कसा परीणाम होऊ शकतो हे आज सांगतो. माझ्या एक कलीग आहेत. . त्यांची इ.४ थी इंग्रजी माध्यमात शिकणारी कन्या . . .मागील आठवड्यात संध्याकाळी आली अन् म्हणाली "मम्मा आय थिंक आय शुड स्टार्ट टेकिंग आय पिल्स. आय डोण्ट थिंक आय वान्ट टू गेट प्रेग्नंट टिल आय ग्रो अप"
हो . . .अगदी ह्याच शब्दात ती बोलली. . . अरे कोणी तरी तिला सांगा इतक्या लवकर आई बाबांची रात्रीची झोप उडवू नकोस ग बाई!!!!!
आत याला काय म्हणाव???? कालाय तस्मै नमः!!!! दुसर काय!!!!

गोष्ट कांदे पोहेंची!!!!

आता लवकरच आमच्या हातात लग्नाची बेडी पडणार आहे. आमच्या जे काही जिवलग मित्र आहेत त्यातील सर्वजण खड्ड्यात पडलेले आहेत अन् आता आमची पडण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे मनमौजी जगण्याचे दिवस लवकरच संपनार आहेत. सध्या आमच्या मातोश्रीनी फक्त वधु संशोधन हे एकच लक्ष्य ठेवल आहे. त्यामुळे प्रत्येक वीक एंड हा फक्त कांदे पोहे यासाठी राखीव झाला आहे. आतापर्यंत ४-५ कार्यक्रम केलेत. अशेच २ अनुभव आज लिहतोय.

अनुभव क्रमांक १:
आईला खूप दिवस टांग मारुन शक्य तेवढा ही कार्यक्रम पुढे ढकलला होता पण शेवटी तिला बिचारीला यश आल अन् आमचा पहिला कांदे पोहे प्रोग्राम फिक्‍स झाला. मी माझ्या अनुभवी मित्रांकडुन थोड्या टिप्स घेतल्या. काही केल तरी ते मित्र. . . आमची हाणायला कधी तरीच संधी मिळते त्यामुळे त्यांनी त्याचा योग्य तो फायदा घेऊन नको असलेल्या सुद्धा टिप्स दिल्या.
शेवटी ती वेळ आलीच, मी,बाबा, ताई अन् जीजाजी असे आम्ही निघालो गाडीत जीजुंनी त्याचे काही अनुभव सांगितले. खर सांगु का त्या दिवशी कॅया माहीत नाही पण हृदयाचे ठोके ७२ वरुन १४४ झाले होते. हसाल तुम्ही पण खर आहे हे!!!
एकदाच आम्ही तिथे पोहचलो, सुरुवातीला सगळी ओळख परेड झाली नाते संबंध, माझ शिक्षण, नोकरी वगैरे. . अस सार काही बोलून झाल. हे सार चालू असताना मी मात्र एकदम गरीब बिचारा सार काही गुमान ऐकत होतो कधी नाही ते मी एवढा शांत बसलो होतो. काय करणार काही मार्गच नव्हता.
आता मुद्द्याच काम मुलीला बोलवा अस कोणीतरी फर्मावल आता माझ लक्ष होत ते तिच्या एंट्री कडे अन् उत्सुकता पण होती.
शेवटी एकदाच आगमन झाल. .अन् ज्या रीतीने झाल ते पाहून आमचा नकार फायनल झाला. देवा रे जी काही तयारी केली त्यावर सगळा पोचारा फिरला. कोणी काही बोलण्याअगोदरच त्या मुलीने माझ्याकडे पाहून विचारल हाच मुलगा का??? च्यायला हिला काय मी वेगळा कोणी वाट्लो की काय?? ( अजुन एकदा पोचारा. . ) मी देवाच नाव घेऊन पुढील परिस्थितीला सामोर जायच ठरवल. मला तर काही विचारायच नव्ह्तच. पण बाकी सारे जण तुम्हाला मुलीला काही विचारायाच असेल तर विचारा असा आग्रह करू लागले.

त्यांनतर आमच्यात झालेला संवाद असा. ( इथेही सुरूवात तिनेच केली.)

ती : तुम्ही काय करता?
मी : म्हणजे??? ( मी भरपुर काही करतो. . .काय सांगु मी आता???)
ती : जॉब करता की सर्विस ???
मी : (ह्या प्रश्नानंतर जागीच फ्लॅट . .) जॉब.
ती : कुठे कंपनीत का??
मी : ( आता मात्र हद्द झाली. .) हो.
ती : जॉब काय आहे ???
मी : इम्प्लीमेंटेशन ला आहे म्हणजे प्रॉडक्ट सपोर्ट ला. (यातल तिला काही झेपल नाही हे समजलच मला.)
ती : मग मंदीचा काही परीणाम??
मी : (आता मात्र डोक हालल. . काय वैताग आहे??? किती सहन करायच) आज तरी काही नाही उद्या काय होईल सांगता येत नाही.
आता मात्र अचूक काम झाल माझ्या या उत्तरा नंतर मात्र कोणता प्रश्न आली नाही. माझ लक्ष मात्र ताई कडे होत तिला माझा वैताग अगदी दिसत होता. मला तर कधी बाहेर पडतो अस झाल होत.
बाहेर आल्यानंतर मात्र कोणाची मला विचारायची हिम्मत काही झाली नाही. ताई ने मात्र माझी जाम फिरकी घेतली. यानंतर बाबांनी त्यांना नकार कळवुन टाकला. तरी पण आठवडा भर त्या लोकांचा फोन येत होता तुम्ही विचार करा आमच्या मुलीत काय कमी आहे??? का नाही म्हणताय अस खूप काही. . . शेवटी मीच वैतागून सांगितल कमी काहीच नाही पण जेवढ काही आहे ते थोड जास्तच आहे. त्यामुळे नको. तेव्हा कुठे ऐकल.

असा हा आमचा पहिला अनुभव होता.
अनुभव क्रमांक २:
हा अनुभव आपल्या पुण्यनगरीतच आला आहे. . दुपारी बाबांचा फोन आला अन् पदमावतीचा एक पत्ता दिला या ठिकाणी तुला गुरुवारी संध्याकाळी मुलगी पाहयला जायचाय असा हुकुम. तुला जमेल का??, वेळ आहे का??, हे काही नाही डायरेक्ट आदेशच . . . आता मी काय बोलणार बापुडा??? गुरुवारी दुपारी जॉब वरुन एक्स क्यूज घ्यायची अन् मग जायच असा प्लॅन झाला. सोबत कोण येणार. . हा एक मोठा प्रश्न होता पण नॉन व्हेज खाउ घालण्याच्या अटीवर सच्या (आमचे गी.डी.) तयार झाला.
गुरुवारी ठरल्या वेळे नुसार आम्ही पोहचलो. मुलीच्या घरी टिपीकल पुणेरी पद्धतीने स्वागत झाल. त्यानंतर चहा- पाणी झाला. जुजबी माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडीलांनी जो गप्पांचा फड जमवला की बस्स!!! नक्की आलोय कशाला हाच प्रश्न पडला. त्यांची पिढी अन् आजची पिढी, आजचे तरुण किती भरकट्लेले आहेत, ते किती कर्तृत्ववान आहेत, महागाई, राजकारण, पुण्यातील रस्ते अन् त्यावरील उपाय, कलमाडी, पवार यांच्या कार्याची समीक्षा, हे काय कमी होत म्हणून सच्या च्या गावाकडे पण घसरले तिकडे असणारे त्यांचे नातेवाईक सार काही झाल पण त्यांची गाडी काही मूळ मुद्द्याकडे येईना. शेवटी मीच वैतागून विचारल मुलगी नाही आहे काय??? ( काय करणार दुसरा काही मार्गच नव्हता. . .अस विचारण प्रशस्त वाटत नाही पण नाइलाज होता) यावर त्यांनी दिलेल उत्तर अस " त्याच काय आहे तुमची आणी मुलीची नाड एक आहे त्यामुळे सदर विवाह होऊ शकत नाही. म्हणून आमचा नकार आहे."
तोपर्यंत नाड म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नव्हत . . .मला हे काही झेपल नाही म्हणून मी सच्या कडे पाहील तर त्याचे पण अवस्था माझ्याहून वेगळी नव्हती. ( नाड आम्हाला एकच माहिती की जो बैल गाडीला वापरतात पण त्याचा . काय संबंध???) शेवटी . . तर्क केला कदाचित हे पत्रिकेतील काही तरी असु शकत.

मला हे समजलच नाही जर नकारच होता तर मला कशाला बोलवल. हीच गोष्ट ते मला फोनवर पण सांगु शकत होते. मी त्यांना विचारल अस का तर म्हणे काही नाही तुम्ही आलात जरा गप्पा पण झाल्या तस पुण्यात आल्यापासून गावाकडच जास्त कोणी भेटत नाही. तुम्ही आल्यामुळे बर वाटल .
यावर मी मात्र काहीच बोलू शकलो नाही. यावर त्यांचा निरोप घेतला अन् आम्ही निघालो. या गप्पा मात्र मला चांगल्याच महागात पडल्या. . . १/२ डे तर गेलाच वर सच्याने या संधीचा योग्य तो उपयोग करून घेतला तो तुम्हाला आता लक्षात आलाच असेल.
यानंतर मी मात्र कांदे पोहे प्रोग्रामचा धसका घेतला आहे. अजुन किती अनुभव घ्यावे लागणार आहेत ते देवालाच माहीत. यावर बाबांची प्रतिक्रिया होती गेले २-३ वर्ष कंपनी अन् कॉंप्यूटर शिवाय थोड दुसरीकडे लक्ष दिल असत तर हे दिवस आले नसते. आता काय बोलणार . . . बोला????

थुंके: सावधान - रु. १००० दंड

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. १००० दंड भरावा लागणार (पुर्वी हा रु.२५ होता फक्त!!!) . . . . असा निर्णय नुकताच पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करुन घेतला. चला निर्णय तर झाला पण त्याच्या अंमलबजावणीच काय??? ह्या निर्णयाची तरी काटेकोर अंमलबजावणी होईल का?? की परत नेहमीप्रमाणे ये रे माझ्या मागल्या. . . . .
अन् चिरी मिरी घेऊन सेटींग करणार्‍या सगळ्यांना एक नवीन कुरण मिळाल चरायला!!!

जाउ द्या यावर किती पण बोलल तरी कमीच आहे. प्रत्येक भारतीय जो पर्यंत सामाजिक शिस्त अन् भान बाळगत नाही तो पर्यंत हे असच चालू राहणार!!!!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा





सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


चप्पलवटा - गोष्ट एका वाल्याची!!

ही कहाणी आहे कलीयुगातील वाल्याची. अध्यात्माची कास धरली तर जीवनात किती बदल घडू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध कॅमेरामेन देबु देवधर यांच्या हाताखाली लाइट्मन म्हणून काम केलेला . . . त्या दरम्यान दारूच व्यसन लागल. . व्यसनाच्या इतका अधीन गेला की होत नव्हत ते सार काही दारुत घाळवुन बसला मग सुरू झाली आयुष्याची वाताहत. . . जवळचे कोणीच राहील नाही. . .सोबतीला उरली ती फक्त हाता पायांची थरथर आणी एकटेपण. . .सगळा अंधकार झाला होता जीवनात . . . . त्या क्षणी एक आवाज आला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." . . .गर्द अंधारात एक आशेचा किरण मिळाला मग सुरूवात झाली नव्या आयुष्याची. गुरू मार्ग सापडला अन् त्यामुळे जगाकडे , जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. . . नवी उमेद मिळाली. . . आध्यात्मीक चमत्कार यापेक्षा वेगळा काय असु शकतो??? स्वामींना गुरू मानून त्यांच्या ओढीने थेट अक्कलकोट गाठल. . . अन्नछत्रा बाहेर भाविकांच्या चपला सांभळन्याची जबाबदारी घेतली . . .त्याचा मोबदला म्हणजे फक्त दोन वेळेच जेवण. . . सेवाभावी वृत्तीने हा प्रवास सुरू झाला. . .जसे दिवस सरत गेले तशी दारू पण सुटली. . अश्यातच मग त्याने स्वतःचे हे अनुभव शब्दबद्ध करायला सुरूवात केली. . .हे सार लिखाण झाल पादत्रान कक्षात . . स्वामिंच्या दारी अश्यातच अजुन एक चमत्कार झाला . . नागपूर येथील प्रकाशण संस्थेचे संचालक अन् स्वामी भक्त प्रदीप मुळे तिथे दर्शानाला आले असताना चर्चेत कुठेतरी या लिखाणाविषयी समजल अन् त्यानंतर जन्माला आल एक आगळ वेगळ पुस्तक " चप्पलवटा ".या पुस्तकात त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्यात आलेले आहे. ही कथा आहे विवेक कळके यांची . . .हा प्रवास आहे एक दारुडा ते स्वामी सेवेकरी असा. . आता त्यांनी ठरवल आहे की राहिलेले आयुष्य स्वामी चरणीच व्यतीत करायच.
मला नाही वाटत चमत्कार याहून वेगळा काही असु शकेन. . . अध्यात्म माणसाच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतो. . जर सर्वांनीच गुरू मार्गाने वाटचाल केली तर आयुष्याच नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. . . ज्ञानेश्वर माउली , तुकाराम महाराज यांनी जो काही मार्ग दाखवला आहे तो जर अनुसरला गेला तर माणूस सुखी व्हायला अन् ह्या जगात शांती नांदायला वेळ लागणार नाही.
मागील आठवड्यात याविषयी लोकमतने दखल घेत बातमी प्रसिद्ध केली आहे.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने!!!!!

उद्या शिक्षक दिन. . .मी शाळेत असताना मला हा दिवस खूप आवडायचा. कारण आमच्या शाळेत शिक्षक दिनी सर्व जबाबदारी 8 ते 10 च्या विद्यार्थंवर असायची .ह्या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी ही त्यांची असायची. त्यामुळे महिनाभर अगोधर् सर्वांना वेध लागायचे, मग प्रत्येकजण आपली कामे ठरवून घ्यायचे. आप आपले विषय अन् त्या दिवसाचे टॉपिक याची तयारी चालू व्हायची. या दिवशी शाळेत जी मजा यायची ती काही औरच असायची. लहानपणीच खूप मोठे झाल्या चा तो अनुभव फार छान अन् खूप काही शिकवणारा असायचा.
आजची पोस्ट ही मी माझ्या शिक्षका साठी लिहीत आहे. त्यांच्या प्रती व्यक्त क्रुतज्ञता करण्याचा एक छोटा प्रयत्‍न.
1. देव गुरुजी:
बालवाडी ते 4थी पर्यंत आम्हाला यांच मार्गदर्शन मिळाल. अतिशय कडक अन् त्याहून किती तरी प्रेमळ आहेत. त्यांआ प्रत्येक गोष्ट ही अतिशय काटेकोर लागायची थोडीसुद्धा चुक माफ नसायची. माझ गणित केवळ यांच्यामुलेच पक्क झाल. शुद्धलेखन हे फकत टाक वापरुन लिहायच असा त्यांचा नियम होता. शाई पेन अन् बॉल पेन याला अगदी बंदी होती. लहानपनात त्यांनी जे काही संस्कार केले त्यामुळेच मी घडलो.
मी त्यांचा फक्त एकदाच मार खाल्ला होता , तो ही गणित शिकताना (मला आठवणीत राहिलेला तसा भरपूर वेळा आम्हाला प्रसाद मिळाला असेल पण आठवत नाही). गणितात ते आम्हाला हिशोब सांगायचे, आम्हाला त्याच उत्तर हे तोंडी द्याव लागायच म्हणजे वहीवर किंवा पाटीवर कोणतीही आकडेमोड करायची नाही. ते हिशोब सांगताना आमचा कधी लक्ष नसायच त्यामुळे हमखास उत्तर चुकाय्च. अस 2-3 वेळा झाल असेल त्यानंतर त्यानी काणाखाली जो आवाज काढला तो अजूनही विसरलो अन् हिशोब पण कधी चुकला नाही.

2. लोंढे मॅडम:
पाचवी ते सातवी या आमच्या वर्ग शिक्षक होत्या. त्यांचा मराठी हा विषय. त्यांच शिकवण इतक सहज सुंदर होत की अवघड असणारे भावार्थ अगदी साध्या सोप्या भाषेत त्या शिकवायच्या. त्यांच मराठी वर प्रभुत्व तर होतच त्या सोबत त्यांना आमच मन पण अगदी अचूक समजायच. आमच्या आनंदात, यशात ,अपयाशात पत्येक क्षणात त्यांचा सहभाग असायचा.
सातवीला स्कॉलरशिपला 2 गुण कमी मिळाल्यामुळे माझा मेरीठ लिस्ट चा नंबर गेला होता. त्यावेळी केवळ त्यांच्यामुलेच मी त्या अपयश स्वीकारू शकलो. त्यांनी त्यावेळी केलेला उपदेश आज ही मला उपयोगी पडतोय.

त्यांनी आम्हाला केवळ एक आदर्श विद्यार्थी नाही तर एक आदर्श माणूस म्हणून कस जगाव हे शिकवल.

3. डॉ. बी.एम. करमरकर
करमरकर सर मला थर्ड इयरला सेकंड सेमला जीओलॉजी या सबजेक्टला गेस्ट लेक्चरर होते. खूप कमी दिवस त्यांचा सहवास मला मिळाला पण त्यात त्यांच्या मार्गदर्शनाने मला अगदी बदलून टाकल . मी आजतागायत एवढा डेडीकेट्ड माणूस पहिला नाही. सर म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. इतक्या ज्ञानी व्यक्तीमत्वाचा मला सहवास मिळाला याचाच मी भाग्य मानतो.
अहो ह्या माणसाने पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. सगळे घाट, पठार ह्यानी पायी फिरले आहेत. सगळे खड्कांचे प्रकार त्यांचे गुणधर्म आजही ह्या वयात त्यांच अगदी तोंड्पाठ आहे. कधी ही काहीही विचारा प्रत्येक प्रश्नाला अगदी अचूक उत्तर मिळणार. जीओलॉजीचा विकीपेडीयाचा म्हणा की!!!
एवढा ज्ञानी माणूस पण राहणीमान बोलन अगदी साध. . विशेष म्हणजे एकाही विद्यार्थ्याला त्यांनी कधीही एकेरी हाक मारली नाही. प्रत्येकाला ते नेहमी आदरातीच बोलवायचे. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस शोधून ही सापडणार नाही.
ह्या वयात ही त्यांचा नवतारूणाला लाज्वेल असा उत्साह आहे ,आज ही ज्ञान लालसा तेवढीच आहे.
या सर्वां विषयी लिहील तेवढ कमीच आहे. काही भावना अश्या असततात की त्या आपण कधीही शब्दात व्यक्त करू शकत नाही.
मी आज जो काही आहे तो केवळ या सर्वांचे आशीर्वाद अन् संस्कार यामुळेच!!!

उपक्रम : मला आवडलेली मराठी वेब साईट

खाली दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा.


ही साईट खूप छान आहे. या वर तर्क क्रीडा म्हणून एक पेज आहे. त्यावर धमाल कोडी आहेत. इतर माहिती पण खूप मस्त आहे. एकंदरीत काय तर जे वाचन कीडे आहेत त्यांना नक्की आवडेल.
तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

नेताजी सुभाशचंद्र बोस


आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची पुण्यतिथी . . . त्यांच्या पवित्र स्म्रुतीस अभिवादन!!!!!!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

India-independence-Day-Grand-Card.jpg Independence day image by vijesh_01

सर्व भारतीय नागरिंकना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

स्वातंत्र्यदिनच्या पूर्व संध्येला. . . .

उद्या आपला स्वातंत्र्यदिन, प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस.पुर्वसंध्येला प्रत्येकजण उद्याच्या तयारीत मग्न आहे. आज प्रत्येक रस्त्यावर, सिग्नलवर, चौका चौकात झेंदयांची विक्री करणारांची गर्दी आहे, तरी स्वाइन फ्लू मुळे यांची गर्दी थोडी कमी आहे. खूप प्रकारचे ध्वज सायकलला किंवा बांबुला अडकवून यांची विक्री चालू असते.

आपल्यासाठी स्वातंत्र्यदिन आणी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशप्रेमाचे अस्तत.इतर दिवशी आपल्याला देशाशी काही घें देण नसत. मग या दिवशी देश प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सारे मार्ग शोधले जात्तात त्या पैकिच एक म्हणजे कागदी किंवा प्लास्टिकचा ध्वज घायचा टेबलवर ठेवायचा, कारमध्ये, भिंतीमध्ये ाडकायवायचा, नाही तर हातात घेऊन गावभर हिंडत बसयाच. मनाला वाटेल तेव्हा हव्य त्या जागी फाडकावायचा. . . अरे तो आपला राष्ट्र ध्वज आहे शो पीस नाही. . कशाच भान नाही. दुसर्या दिवशीच हे ध्वज रस्त्यावर अन् आमच बेगडी देश प्रेम सुद्धा!!! कचरा कुंडी,रस्त्यावर फाटलेले, चुरागळून पडलेले हे ध्वज सर्रास तुडवलेले जातात अन् त्याच आम्हाला काही सोयर सुतक नसत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाल आहे या मागे खूप बलीदान आहेत. त्या बरोबरच मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तेवढेच जवान शहीद झाले आहेत.

स्वातंत्र्य दिनाला धवज घ्यायचा नंतर तो कित्येक दिवस धूळ खात पडलेला असतो. . .मग परत येतो प्रजासत्ताक दिन की परत नवा ध्वज. . .अन् पुन्हा तोच प्रवास चालू. . .आणी आमच्या आजूबाजूला हे सार घडत असताना आम्ही मात्र नीर्विकार असतो. . आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. हेच आपल देश प्रेम??? हीच स्वातंत्र्यसैनिकंच्या बलिदानाची किमत आहे??? हे आपण किती दिवस अस वागायच??

या वर्षी तरी ध्वज घेताना किमान खालील विचार करा. . .प्लीज. . . 1. केवळ हौस म्हणून किंवा स्वस्त मिळतो आहे म्हणून ध्वज विकत घेऊ नका 2. ध्वज घेण्यापूर्वी आपण तो कशासाठी अन् कुठे लावणार आहोत याचा नक्की विचार करा 3. घ्यायचा असेल तर शक्यतो कायम स्वरूपी टिकतील अशे धातूचे ध्वज घ्या 4. वाटेल त्या ठिकाणी स्टिकर्स चिटकवू नका 5. आजु बाजूला पडलेले ध्वज पायदळी येऊ देऊ नका 6. ध्वजाचा मान राखा 7. जे मान ठेवत नसतील त्यानाही मान ठेवण्यास भाग पाडा. आपल्या राष्ट्र ध्वजाचा मान ठेवणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे याची जाणीव सदैव ठेवा. . . .जय हिंद