tag:blogger.com,1999:blog-54100987042995437152024-03-13T20:50:49.109+05:30मनमौजीYogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comBlogger81125tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-42488662477430999632019-02-02T00:48:00.001+05:302019-02-02T00:48:23.107+05:30वनवास<p dir="ltr">नुकतंच प्रकाश नारायण संत यांच "वनवास" पुस्तक वाचलं. लंपन नावाच्या एका शाळकरी मुलाचं भावविश्व यात रेखाटलं आहे.लंप्या म्हणजेच लंपन याच भावविश्व इतकं सुंदर उभं केलं आहे की वाचता वाचता तुम्ही अवघे लंपन मय होऊन जाता.</p>
<p dir="ltr">लंपन हा शाळेत जाणारा असून नुकताच पौगंडावस्थेत प्रवेश करतो आहे.त्यादरम्यान आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा त्याच्या नजरेतून घेतलेला धांडोळा म्हणजे वनवास हा कथासंग्रह आहे.हा प्रवास इतका अलगद आहे की त्याची प्रत्येक कथा तुम्हाला हरखून टाकते.</p>
<p dir="ltr">लंपन हा त्याच्या आजी आजोबां सोबत राहत असतो त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला आईची वाटणारी उणीव.तिच्या बाबतीत त्याचं असणार हळवंपण....आईची आलेल पत्र वाचताना तो आईच्या विचारात त्याच हरखून जाणं हे सार खूप भावणार आहे.</p>
<p dir="ltr">बाबा ,आजी ,आजोबा ,त्याची लहान भावंड, त्याचे मित्र अशा त्याच्या बाजूला असणाऱ्या प्रत्येका सोबतच्या नात्यांचा प्रत्येक कथेमागे पदर उलगडत जातो अन सोबतच लंप्या सुद्धा.</p>
<p dir="ltr">यामधील सर्वात सुंदर जे वर्णन आहे ते लंप्या अन सुमी बाबत.सुमी ही त्याची खूप जवळची मैत्रीण आहे.सुमी बद्दल त्याच असणार आकर्षण. तो सुमी पुढे कधीच व्यक्त होत नाही पण तिच्यासाठी असणार ते सुप्त प्रेम,तिचा तो हवा हवासा वाटणारा सहवास हे सार कथेतून उलगडत.लंप्या च्या भाषेत सांगायचं झालं तर...."सुमीची आठवण आली की पोटात गडबड होते आहे....अस वाटायला लागतं"...तसच काहीस लंप्याच्या भावविश्वात गेलं की वाटत.</p>
<p dir="ltr">लंप्या च्या कथा जेवढं तुम्हाला सुख अन आनंद देतात त्यासोबत च एक हलकासा अस्वस्थ करणारा अनुभव पण देतात. </p>
<p dir="ltr">या कथा संग्रहाच सर्वात जास्त यश जात ते प्रकाश संत यांच्या लिखाणशैली ला.प्रत्येक कथा ही एक नव्या प्रकारे तुमच्याशी संवाद करते.अन संवादात तुम्ही सार विसरून केव्हा गुरफटून जाता हे समजत नाही...लंप्याच्या भाषेत सांगायचं झालं तर या मॅड सारख्या कितीही वेळा मी वाचू शकतो.</p>
Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-18468775952926440372012-12-25T09:24:00.000+05:302012-12-25T11:14:18.044+05:30विचार"जंत"...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
दिसागणिक सारं काही बदलत चाललयं.मानवजातीने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर दिवास्वप्न वाटणार्या संकल्पना सत्यात साकार केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ जग मुठीत सामावुन टाकल. जगाच्या दोन विरुद्ध टोकाला असणार्या समुदयांमध्ये विचारांची देवाण घेवाण सुरु झाली.प्रत्येकाला आप आपलं मत मांडण्यासाठी "सोशल नेटवर्कींग" च्या रुपाने माध्यम मिळालं अन यातुनच एक नवा जंत जन्माला आलाय .... तो म्हणजे "विचारजंत".<br />
<br />
कुठेही जा हा तुम्हालाच भेटणारच.जळी, स्थळी, काष्ठी सर्वदुर याचा वावर आहे.विशेषतः फ़ेसबुक, टिव्टर यावर यांचा सर्वात जास्त वावर. इथे गेलात की हमखास भेटणारच. त्यानंतरच दुसर ठिकाणं म्हणजे चॅनेल - पॅनेल. कोणतही वृत्त्वाहिनी सुरु करा...चार पाच विचारजंतवादी एकत्र येउन टाळ कुटत बसलेलेच असतात.<br />
मला ह्या विचारजंताच एका गोष्टीच फ़ार नवल वाटत...ते म्हणजे...विषय कोणताही असो त्यावर यांची एक्सपर्ट प्रतिक्रिया असणारच. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सामाजिक इ.इ. विषय कोणताही असो हे विचारजंतवादी सभा ठोकणार म्हणजे ठोकणारच. एक मराठी वाहिनीवर प्राईम टाईम मध्ये अशेच एक विचारजंती रोज म्हणल तरी चालेल असतातच. कोणताही प्रश्न असो एक्सपर्ट म्हणुन हे हजर असतातच. ह्या माणसाला दुसर काही काम आहे की नाही हाच मला प्रश्न आहे.<br />
<br />
वृत्तवाहिनीवर तरी ते वाहिनीवाले ज्यांना बोलवतील त्यांनाच झेलायला लागतय. पण फ़ेसबुक अन टिव्टर वर या लोकांसाठी तर मोकळा मंगळवारच. आओ जाओ घर तुम्हारा. थोड कुठं खट्ट झाल की भिंती रंगावयला तयार. खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणल्यावर कोणी काहीही लिहु शकतो अथवा वागु शकतो पण त्याला थोड तरी तारतम्य असाव. प्रसंगानुरुप आपण काय बोललं पाहिजे किंवा एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना थोड तरी तारतम्य बाळगल पाहिजे.<br />
<br />
बाळासाहेबांचा मृत्यु, आझाद मैदानावरील घटना, सचिन तेंडुलकरची निवृत्ती, दिल्ली बलात्कार प्रकरण अश्या खुप सार्या घटनांमध्ये ह्या विचारजंतानी जे अकलेचे तारे तोडले होते ते पाहुन संताप आला होता.अन यांच्या सोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. त म्हणतात डुक्कराबरोबर कुस्ती करण्यात काहीच मजा नाही...कारण ते डुक्करच त्याला चिखलातच लोळायला आवडत.<br />
<br />
खर सांगायच तर कधी कधी या सर्व गोष्टींचा नकळत स्वतःवर ही परीणाम होतो.खुपदा मनस्ताप पण होतो. कधी कधी या लोकांचं बौद्धिक इतक्या खालच्या पात्रतेला जातं की त्यावर कसं रिअॅक्ट व्हाव हेच कळत नाही.<br />
शेवटी विचार पक्का केला अन स्वतःच सोशल लाईफ़ लिमिटेड करुन घेतल. टिव्टरवर फ़क्त ठराविकच लोकांना फ़ॉलो केल बाकी सर्वांना अनफ़ॉलो केलं. फ़ेसबुकवर पण ठराविक मित्रांचेच अपडेट्स ला सबस्क्राईब केलं.एका ठराविक वेळेलाच फ़क्त सोशल साईटस वर जातो. अन सर्वात महत्वाच म्हणजे न्युज चॅनेल अन न्युज पेपर दोघांनाही राम-राम ठोकलाय. तसही आजकाल बातम्या पाहुन किंवा वाचुन ज्ञानात काही भर पडेल अस वाटत नाही.<br />
<br />
मी तरी ह्या "विचारजंतांपासुन" मुक्ती मिळवली आहे....मस्त वेळ मिळतो आहे...चांगली पुस्तक वाचतो आहे. डोक्याला शॉट नाही.<br />
<br /></div>
Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-78502666362256829142012-09-20T16:29:00.000+05:302012-09-20T16:41:04.754+05:30उद्याचे "अराजक"....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काही महिन्यांपुर्वीच बहिणीने एक शाळेत शिक्षक म्हणुन जॉईन केलं. सध्या ती ५ ते ७ वी ला सध्या शिकवते. तिने सांगितलेले हे दोन अनुभव .सध्या त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत मागील आठवड्यात ६वी च्या मुलांसाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली की ज्या मध्ये त्यांना एक काल्पनिक कथा लिहायची होती. त्यासाठी कोणताही विषय असा देण्यात आला नव्हता विद्यार्थ्याने त्याला आवडेल त्या विषयावर लिहायच होत.त्याचा निकाल असा होता.<br />
<br />
नकारात्मक कथा - ९०%<br />
सकारात्मक कथा - १०%<br />
<br />
नकारात्मक कथा म्हणजे हिंसक तर सकारात्मक म्हणजे सामाजिक संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळावी अशी गोष्ट.<br />
<br />
अजुन एक अनुभव....हा मात्र ७वी च्या मुलांबाबत.मराठी च्या चाचणी मध्ये अपुर्ण म्हणी पुर्ण करण्यासाठी होता त्याची उत्तर पाहा<br />
१. ज्याची खावी पोळी <u>त्याला घालावी गोळी.</u><br />
२. घरोघरी<u> हीच बोंब</u><br />
३.उथळ पाण्याला <u>घागर नळाला.</u><br />
<br />
सुरुवातीला जेव्हा ताई ने मला सांगितल तेव्हा मला यात फ़ारस विशेष अस काही जाणवल नाही. पण नंतर लक्षात आल उद्याच्या पिढीचं मानसिकतेचं प्रतिबिंबच या गोष्टींमधुन दिसतय. उद्याच्या पिढीची मानसिकता कुठे तरी नकारात्मक अन हिंसक होते आहे का? सध्या बालगुन्हेगारीच वाढलेलं प्रमाण पाहता कुठे तरी ह्याची जाणीव होते.पुण्यामध्येच खंडणीसाठी वर्गमित्रांनी केलेला खुन, एकतर्फ़ी प्रेमातुन दहावीतल्या मुलीची केलेली हत्या.हे सारचं मन सुन्न करणार आहे.<br />
<br />
अचानक अस झालय तरी काय त्यामुळे अस घडतय. याला मुख्यतः आपणच जबाबदार आहोत. आपलं बालपण अन आजच्या पिढीचं बालपण किती फ़रक आहे? आपल्यावर झालेले संस्कार अन आजच्या मुलांवर होणारे संस्कार. संस्कार करणारे घरामधील वडीलधारी माणसचं आजच्या चौकोनी कुटुंबातुन गायब झाली आहेत. आई-बाबा दिवसभर ऑफ़िसात अन मुलगा पाळणाघरात अशी सध्याची परिस्थिती आहे.त्यामुळे मुलांबरोबरचा संवाद बराचसा कमी झालाय.<br />
<br />
सध्याच सामाजिक जीवनमान बिघडवणारी मुख्य गोष्ट म्हणजे "इडीयट बॉक्स" अर्थात टी.व्ही. आज घराघरात टी.व्ही म्हणजे जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.अन टी.व्ही. वरुन सध्या असत तरी काय....त्याच त्या साचेबद्ध मालिका. सहजच तपासुन पाहा अशा किती मालिका आहेत की ज्यांच्या माध्यमातुन संस्कारक्षम अशे विचार आपल्यापर्यंत पोहचले जातात. सतत सासु,सुना,प्रेम प्रकरण नाही तर कुठला तरी रिएल्टी शो हेच सुरु असत. एक तर टी.व्ही. नाही तर मग कंप्युटर किंवा मोबाईल हेच मनोरंजनाची साधन झाली आहेत.<br />
<br />
<br />
मैदानी खेळ,संस्कार वर्ग हे सार भारत ते इंडीया हे संक्रमण होताना नामशेष होतय की काय अशी भिती वाटायला लागली.बालपणात जर तुम्हाला बहुतांश वेळा जर अशे संस्कार मिळणार असतील तर पिढी नकारात्मकच घडणार. <br />
<br />
<br />
सरसकट सर्वांना एका चष्म्यातुन नाही पाहता येणार ....सर्वच पिढी नकरात्मक अथवा हिंसक होते आहे अस नाही पण अशी भावना असणार्यांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी कमी पण नाही. गरीब, मध्यम वर्ग,उच्च मध्यम वर्ग अन श्रीमंत सर्व प्रकारच्या समाजातील मुलांमध्ये अशी भावना आहे.<br />
<br />
जगण्याच्या या शर्यतीमध्ये धावताना ज्यांच्या साठी हे आपण करतोय तेच जर ही उद्याची ही जगण्याची शर्यत हारणार असतील तर आमच्या धावण्याला अर्थ तो काय?????<br />
<br />
<br />
<br /></div>
Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-90349429509301678502012-09-18T11:22:00.001+05:302012-09-18T11:22:44.330+05:30मी येतोय...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<b>बाप्पा :</b> मुषकराव चला तयारी झाली का पुर्ण....उद्या आपल्याला निघायच आहे....उद्यापासुन दहा दिवस पृथ्वीतलावर आपला मुक्काम असणार आहे.<br />
<br />
<b>मुषकराव :</b> बाप्पा, तयारी तर झाली आहे....पण ह्या वर्षी मनात जरा धाकधुक आहे.<br />
<br />
<b>बाप्पा:</b> का रे बाबा....काय झाल तुला? आता कसली धाकधुक वाटते आहे?<br />
<br />
<b>मुषकराव: </b>बाप्पा, क्षमा असावी पण तुमच्या नकळत मी मागील आठवड्यात पृथ्वीची चक्कर मारुन आलोय. ह्या वर्षी तुमच्या स्वागताची तयारी कशी केली आहे हे पाहण्यासाठी गेलो होतो.<br />
<br />
<b>बाप्पा : </b>(स्मित हास्य करत...) अरे मुषकराव तुम्ही तर फ़ार हुषार निघालात द्या बर वृतांत...जरा मला पण कळु द्या ....यावर्षी तयारी कशी झाली आहे ते.<br />
<br />
<b>मुषकराव: </b>बाप्पा....काय सांगु अन कस सांगु....सुरुवात कशी करावी तेच समजत नाही. अहो महागाई,भ्रष्टाचार,गुन्हेगारी यात सर्व जनता होरपळते आहे.रोज एक नवीन घोटाळा अन महिन्यागणिक होणारी भाववाढ. राजा तुपाशी अन जनता उपाशी अशीच काहीशी परिस्थिती आहे. सामान्य चाकरमान्याला घरखर्चाची जुळणी करता करता नाकीनऊ आलयं. हे सार काही कमी होतं ,त्यात वरुणदेव यावर्षी नाराज झाले त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. आत्ता बाप्पा....सांगा...ह्या अश्या परिस्थिती मध्ये कोण तुमचं दणक्यात स्वागत करेल?<br />
<br />
<b>बाप्पा:</b> मुषकराव......तुम्हाला काय वाटतय मला ह्या परिस्थिती मला माहित नाही का? मी हे सर्व जाणुन आहे. पण तुला माहित आहे का?? हे सारं असुन ही माझा भक्तगण माझ स्वागत नेहमीप्रमाणेच तितक्या धुमधडक्यात करणार. सिलेंडरच्या किंमती वाढु दे किंवा डिझेल वाढु दे....माझ्या सेवेत ते कोणतीच कमी पडु देणार नाही हा मला विश्वास आहे अन मी पण त्यांच्या वर कृपादृष्टी मध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही हा त्यांचा विश्वास आहे. हा आमचा एकमेकांवरील विश्वासचं आमच नातं दृढ करतो आहे. अरे फ़क्त "बाप्पा येतोय...." म्हणलं की सर्व कशे उत्साहात येतात बघ. हे दहा दिवस म्हणजे माझा उत्सव नसुन त्यांच्या जगण्याचा उत्सव आहे. संपुर्ण वर्षभरासाठीचा असणारा सुख, समृद्धी अन आनंदाचा ठेवा आहे. या दहा दिवसात माझ्या सेवेत काही पण कमी पडु नये म्हणुन प्रत्येक जण हा अहोरात्र झटत असतो. सर्व भक्तगण आप आपल्या चिंता ,दुःख सार काही विसरुन फ़क्त माझ्या सेवेत मग्न असतो. अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.<br />
<br />
<b>मुषकराव:</b> बाप्पा....माझ्या मनात आता कोणताही किंतु नाही...तुमच्या या बोलण्यातुनच माझ्या सर्व शंका निरसन झालं. चला आता थोडी विश्रांती घेउ या उद्या सकाळी लवकर पोहचायच आहे, आपल्याला उशीर व्हायला नको.<br />
<br /> <b> ॥गणपती बाप्पा मोरया॥</b><br />
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------<br />
<br />
हो...हो...बस्स एकच दिवस....येतोय...तुमचा आमचा सर्वांचा बाप्पा येतोय........सुख, समृद्धी,चैतन्य, आनंद सारं काही घेउन येतोय..... स्वागताला तयार आहात ना तुम्ही ???</div>
Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-25911507871453664352011-06-03T18:05:00.001+05:302011-06-03T18:41:25.251+05:30यक्ष प्रश्न ?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
<div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">यक्ष प्रश्न म्हणजे नक्की काय असत अस मला नेहमी वाटायच.यक्ष प्रश्न कसा असु शकतो याचा प्रत्यय मला माझ्या भाचीने दिला.आता सुट्टी आली तेव्हा सतत नवीन प्रश्न अन त्यांची उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली होती.एवढ सुचत तरी कस ते देव जाणो.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागायची.गोष्ट सांगताना पण अगदी विचार करुन बोलाव लागायच कारण प्रत्येक गोष्टीतुन इतके “का” निर्माण व्हायचे की बस्स. त्या “का” ची समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत माझा पिट्टा पडलेला असायचा.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">या सर्वातुन सुटका व्हावी म्हणून म्हणलं चला हिला आपण मराठी मुळाक्षर शिकवु या.त्यासाठी कार्यालयातुन येताना मराठी मुळाक्षरांच पुस्तक घेउन आलो.आज गोष्ट नको त्याऐवजी आपण मुळाक्षर शिकु या अस म्हणुन तिला मुळाक्षर कस गिरवायच हे सांगितल अन मी आपल उर्ध्वपटामध्ये डोक खुपसल. हुश्श...आज बाकी आपली सुटका झाली अश्या अविर्भावात असतानाच उर्वीने भलामोठ्ठा बॉम्ब टाकला.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: मामा, अ च्या डोक्यावरच का रेष द्यायची?</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी:बेटु, असच लिहतात.,तिथ पुस्तकात वर बघ त्यांनी अ च्या फ़क्त डोक्यावरच रेष दिली आहे नं. (च्यायला आजपर्यंत मला हा कधीच प्रश्न पडला नव्हता त्यामुळे याच उत्तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. याला म्हणता “आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडणे” )</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: त्यांनी अस का लिहल ? त्यांना कोणी सांगितल?</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी:पिल्लु,सर्वजण असच लिहतात अन बघ त्याच्या डोक्यावर रेष दिली की अक्षर छान दिसत. असच लिहायच बर आता.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">(मी शक्य तितक समजवायचा प्रयत्न करत होतो.पण भाची ने अस काय यॉर्कर टाकला होता की माझी दांडी गुल झाली होती)</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">आता मी अस बोलल्यावर बिचारी काही न बोलता गुपचुप मुळाक्षर गिरवायला लागली. मला पण हायसे वाटले.चला सुटलो एकदाचा अस म्हणुन मी परत माझ्या कामाला लागलो.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">पाच-दहा मिनीटांच्या शांततेनंतर पुन्हा आवाज आला मामा</span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">SSSSSSSSSSS…</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: मामा, हे बघ मी खाली पण रेष दिली आहे अन हेच सुंदर दिसतय.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी: नाही बेटु पण अस नाही लिहीत फ़क्त अक्षराच्या वरच रेष द्यायची असते.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: नाही...मी खाली पण देणार तेच मला आवडलय.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी: बर ठीक आहे तसच लिहुन काढ.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">पांढर निशाण दाखवुन मी माघार घेतलेली असते.पण कुठे तरी मनात याच उत्तर काय असु शकते हाच विचार मनात घोळत असतो.</span><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">त्या विचारात असतानाच परत पुन्हा एकदा आवाज येतो अन छातीत पुन्हा धस्स होत कारण परत एकदा यॉर्कर आहे हे माहितच आहे त्यामुळे हा आता टोलवता येणार की पुन्हा दांडी गुल हे येणारा प्रश्नच ठरवणार होता.</span></div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"> </span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"></span> </div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: मामा अरे मी </span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">A,B,C <span lang="HI">लिहताना तर नाही देत रेष मग अ, आ,इ लिहताना का बर द्यायची?</span></span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">आता मात्र मला उर्वी मध्ये मलिंगा दिसु लागतो.त्याच्याहुन भारी यॉर्कर टाकणार कोणी असेल तर हीच अशी माझी खात्री पटलेली असते.ह्या पण प्रश्नाच उत्तर नसल्यामुळे वेळ मारुन नेण गरजेचं असतं.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी: मला नाही माहित,मी एक काम करतो उद्या माझ्या टीचरला विचारतो अन तुला सांगतो .ठीक आहे.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">यादरम्यानच बोलता बोलता उजव्या हाताने लिहता लिहता नकळतच तिने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केलेली असते.आता या प्रश्नापासुन सुटका करायची म्हणुन..</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मी: उर्वी, डाव्या हाताने लिहु नये उजव्या हाताने लिहीत जा बर.</span></div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"> </span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"></span></div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">उर्वी: का बर? डाव्या हाताने का लिहायच नाही....लिहील तर काय होईल?</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">आजपर्यंत नेहमी काही चांगल असेल तर उजवा अन वाईट असेल तर डावा असाच समज...दोघांमध्ये भेद हा चुकीचा आहे हे माहीत असुन ही उजव्याचाच हट्ट का हे मात्र मलाही माहित नाही. </span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoNormal"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">आता तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला जरुर कळवा.</span></div><div class="MsoNormal"><br />
</div><div class="MsoListParagraphCxSpFirst" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">१.<span style="font: 7pt "Times New Roman";"> </span></span><span dir="LTR"></span><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">मराठी मुळाक्षर लिहताना त्याच्या डोक्यावरच रेष द्यायची?</span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"></span></div><div class="MsoListParagraphCxSpMiddle" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">२.<span style="font: 7pt "Times New Roman";"> </span></span><span dir="LTR"></span><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">इंग्रजी अक्षरांच्या वर रेष का नाही द्यायची?</span><span style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";"></span></div><div class="MsoListParagraphCxSpLast" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;"><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">३.<span style="font: 7pt "Times New Roman";"> </span></span><span dir="LTR"></span><span lang="HI" style="font-family: "Arial Unicode MS","sans-serif";">आपण नेहमी उजव्यालाच का प्राधान्य देतो?</span></div><div class="MsoNormal"><br />
</div></div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-83799429174937122082011-04-05T14:31:00.002+05:302011-04-05T14:38:51.922+05:30प्रिय आफ़्रिदी...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">प्रिय आफ़्रिदी,<br />
<br />
दोन दिवसांपुर्वी तु मायदेशात दाखल झाला तेव्हा तु मिडीयासमोर दिलेली मुलाखत पाहुन मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.....हे अस कस शक्य आहे....तो बोलणारा नक्की तुच आहेस का??? एवढा संवेदनशील अन परीपक्व तु कसा होऊ शकतो....पण असो तुझ्या कालच्या मुलाखतीने मनावरील शंकाचे सर्व ढग दुर झाले...अन पुन्हा एकदा दाखवुन दिल की तु बदलेला नाहीच मुळी तु जसा आहे तसा आहेच...ते म्हणतात सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.<br />
<br />
सरड्याप्रमाणे रंग बदलत अवघ्या दोन दिवसात तु तुझी दोन वेगवेगळी रुप दाखवली...अर्थात तु हे जे काही केल हे स्वतःला वाचवण्यासाठीच...पण नेहमी एक लक्षात घे स्वतःचे अवगुण लपवण्यासाठी किंवा स्वतःच अपयश झाकण्यासाठी दुसर्याला बदनाम करायची काही एक गरज नसते.<br />
<br />
तुझा पहिला आक्षेप आहे की भारतीय खेळाडु मोठ्या मनाचे नाहीत....पण एक लक्षात घे पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःहुन पॅव्हेलियनचा रस्ता पकडणार्या तेंडुलकरचा हा संघ आहे.....अस एक उदाहरण तरी आहे का तुझ्या संघात?? तुमच्या बकबकीला नेहमीच आम्ही आमच्या खेळातुन उत्तर दिल आहे. मग तो तेंडुलकर असो, गंभीर असो किंवा व्यंकटेश प्रसाद.इतिहास काढायचा झाला तर तुम्ही मैदानात केलेल्या पराक्रम सर्वश्रुत आहेच....<b>अरे तुम्ही प्रामाणिकपणे हारला तरी आहात का??</b><br />
<br />
आमचा संघ हा एकसंध आहे...त्यांची एकजुट तु विश्वचषक जिंकल्यानंतर पाहिलच असशील. आपल्या सहकर्यांना शिव्या घालण्यात धन्य मानणार्यांनी मनाच्या मोठ्यापणाच्या गप्पा करु नयेत.<br />
<br />
आता आक्षेप दुसरा....गंभीर बद्दलचा....त्याने हा विजय २६/११ च्या शहिदांना समर्पित केला तर तुझ्या का बा पोटात कळ आली?? कसाब तुझ्या देशाचा आहे म्हणुन? आमच्या देशात होणारे दहशतवादी हल्ले,अतिरेकी कारवाया याचे कर्ते करविते कोण आहेत हे जगाने पाहिलच आहे.जेव्हा जेव्हा आम्ही मैत्रीचा हात दिला तेव्हा तेव्हा तुम्ही आमचा विश्वासघातच केला...एका बाजुला मैत्रीसाठी बोलणी करायची अन दुसर्या बाजुला आमच्या देशात अतिरेकी घुसवायचे हे अगदी साळसुदपणे चालु आहे. २६/११ च्या हल्ल्यात आम्ही काय गमावल आहे हे तुझ्या सारख्यांना संवेदना नसलेल्यांना नाही कळणार.<br />
<br />
आता आक्षेप तिसरा...आमची मिडीया.....तुझ्या माहिती साठी सांगतो आमच्या देशात लोकशाही आहे...लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य....तुला ही व्याख्या झेपणार नाही हे माहित आहे तरी पण प्रयत्न केला...तर..आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन माध्यमांकडे पाहिल जात...सध्या काही वाईट प्रवृत्ती आल्या आहेत पण त्यामुळे सारीच प्रसार माध्यम वाईट होत नाही. जेसिका लाल की जिला आमच्या प्रसारमाध्यमांमुळे न्याय मिळाला...आमच्या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे...अशा अनेक विधायक गोष्टी आहेत की ज्यांना आमच्या देशातील प्रसारमाध्यमांनी जगापुढ आणल आहे.आमच्या देशात प्रसारमाध्यमांचा आदरयुक्त दरारा आहे...तुमच्या माध्यमांमध्ये काय चालत हे मी काही नव्याने सांगायची गरज नाही.<br />
<br />
आमचा देश हा कलाकार अन त्यांची कला याचा सन्मान करणारा आहे म्हणुनच तुझ्या देशातील कितीतरी कलाकार इकडे येण्यास उत्सुक असतात. नुसरत फ़तेह अली खान,राहत फ़तेह अली खान,शकील यासारख्या ्कलाकारांना प्रसिध्दी,पैसा,मान मरातब हा आम्हीच मिळवुन दिला आहे.एवढच काय तर सा रे ग म प सारख्या स्पर्धेतुन तुझ्या देशातील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवुन दिल. कारण आम्ही कलेचे सन्मान करण जाणतो एवढा आमचा मनाचा मोठेपणा आहे.<br />
<br />
अरे तुम्ही तुमच्या कलाकरांना जे देउ शकला नाही आमच्या देशाने दिले आहे. आमच्या देशाने तुम्हाला काय नाही दिले...सार काही आमच्या देशाने दिले आहे अगदी तुमच्या अस्तित्वा पासुन ....<br />
<br />
आमच्यासाठी आमची मातृभुमी कोणत्याही जात,पात अन धर्म याहुन मोठी आहे.आमच्या ह्र्दयामंध्ये फ़क्त प्रेम आहे ते ही कोणत्या धर्माच्या रेषेशिवाय. इथे प्रत्येक जण हिंदु,मुस्लीम, शीख, ख्रिश्चन असण्याअगोदर भारतीय आहे. म्हणुनच की काय २६/११ चा हल्ला असो किंवा क्रिकेटचा विश्वविजय प्रत्येक क्षणी इथे प्रत्येक जण फ़क्त भारतीयच आहे अन भारतीयच राहणार.<br />
<br />
<b>तु म्हणतो त्या प्रमाणे जर भारतीय चुकुन कधी संकुचित झाले तर जगाच्या नकाशावरुन एक देश कमी होइल हे लक्षात घे.</b><br />
<br />
जयहिंद<br />
<br />
-एक सामान्य भारतीय.</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com39tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-73111796143322022022011-04-03T22:27:00.001+05:302011-04-03T22:40:55.690+05:30हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभे्छा....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">सर्व वाचकांना अन मित्रपरीवाराला हिंदुनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7EE-1TzDrA4mcE3zUaiLPexHoKvd4O6bVTbrs97KBUUf1UmUIzxGIH_9vYzml4wuNCdI7b6_ULFlTR0nDOraQ80TWFj_UzAgDrN3ne51urrUAdJ2Ll9u1v4khpnAiti_F12bxlENqKJw/s1600/Capture.PNG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7EE-1TzDrA4mcE3zUaiLPexHoKvd4O6bVTbrs97KBUUf1UmUIzxGIH_9vYzml4wuNCdI7b6_ULFlTR0nDOraQ80TWFj_UzAgDrN3ne51urrUAdJ2Ll9u1v4khpnAiti_F12bxlENqKJw/s320/Capture.PNG" width="320" /></a></div><br />
हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी, यशदायी, आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना.<br />
<br />
शुभेच्छा पत्र <a href="http://www.chitrakavita.com/">चित्रकविता</a> वरुन साभार</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-12578584563035616342011-04-03T09:44:00.001+05:302011-04-03T10:12:36.596+05:30आणि बुद्ध हसला....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">तब्बल २८ वर्ष ह्या क्षणाचा करोडो लोक वाट पाहत होते...अखेरीस तो आज पुर्णत्वाला गेला.<br />
<br />
आपला सचिन गेली दोन दशक ज्याने विक्रमांचे डोंगर रचले.ज्याच्या झोळीत आज पर्यंत असंख्य विक्रम आहेत तरी पण एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे "विश्वचषक". जस एखाद्या पांढ्र्या शुभ्र कागदावर एक लहानसा काळा डाग असावा अन त्या डागाच अस्तित्व संपुर्ण पांढर्या शुभ्र कागदला झाकोळुन टाकत.तसच काहीस सचिनच्या बाबतीत झाल होत.गेली दोन दशक त्या डागाच ओझ मनावर होत...सचिनच्या अन प्रत्येक सचिनच्या चाहत्यावर.आज अखेरीस ते दडपण दुर झाल.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvipc5Ol3cxWuel98uXPKR7Jk2Bet-jqB653JvoN3syPKcNjeoNPHuYXuKzJfaEwGNRu1LS2pWtzAeWHJNec2cxCNzlMG1-yuKXAZcsaPp43kLS4ItdQeK4_iPTfJjFRsvk7hprGZnxVw/s1600/world-cup.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="248" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvipc5Ol3cxWuel98uXPKR7Jk2Bet-jqB653JvoN3syPKcNjeoNPHuYXuKzJfaEwGNRu1LS2pWtzAeWHJNec2cxCNzlMG1-yuKXAZcsaPp43kLS4ItdQeK4_iPTfJjFRsvk7hprGZnxVw/s320/world-cup.jpg" width="320" /></a></div><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiYDVdcm0qs-ifeWbNqHtTr6l_PkfsnWZoFSR8kI_llHo0rRRZ-9cUVeTDRy9Fy35jeGDEuePfun-tgzOfbBlyIFAhArVUAx7u5jbSvp-e6-xNXWzBpq2kiFuTjti1xYm7F5NcukIB-tjI/s1600/199249_1894624681795_1126890555_32192992_740444_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="198" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiYDVdcm0qs-ifeWbNqHtTr6l_PkfsnWZoFSR8kI_llHo0rRRZ-9cUVeTDRy9Fy35jeGDEuePfun-tgzOfbBlyIFAhArVUAx7u5jbSvp-e6-xNXWzBpq2kiFuTjti1xYm7F5NcukIB-tjI/s320/199249_1894624681795_1126890555_32192992_740444_n.jpg" width="320" /></a></div><br />
<br />
<br />
<br />
<b>कालच्या सामन्यात सचिन खेळला नाही याच नक्कीच दुःख आहे पण दुसर्या बाजुने विचार केल्यावर वाटत एका दृष्टीने बर झाल आजपर्यंत ज्याने आपल्या खेळाने प्रत्येकाला भरभरुन दिल.अनेक कठीण प्रसंगी देशाचा तारणहार झाला.त्याला जर याचा परतावा द्यायचा असेल तर काल आपल्या टीम ईंडीया ने ज्या रितीने परतावा केला याहुन अमुल्य असा परतावा होऊच शकत नाही. गेली दोन दशक ज्या हातांना फक्त दान देणं एवढच ठाउक होत त्या हातांनी काल प्रथमच काही घेतल आहे.</b><br />
<br />
मायभुमीमध्ये मिडीया, रवी शास्त्री सारखे विघ्नसंतोषी लोक व चाहत्यांच्या अपेक्षांच ओझ अशा प्रचंड दडपणात टीम इंडीया ने जो खेळ केला आहे त्याला मनापासुन सलाम करावासा वाटतो आहे.<br />
<br />
चक दे इंडीया......<br />
<br />
टीम इंडीया तुमचे खुप खुप आभार....आयुष्यातील खुप अविस्मरणीय अशे क्षण दिले आहेत....कोणी काही बोलो आम्हाला तुमचा अभिमान आहे.<br />
<br />
</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-24836998054930864722011-03-05T13:17:00.001+05:302011-03-05T13:22:35.472+05:30लहान तोंडी मोठा घास...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">मागील सप्ताहात मराठी पाउल पडते पुढे हा कार्यक्रम पाहण्यात आला.नितीन देसाइ यांची निर्मिती असल्यामुळे तो भव्यदिव्य असणारच यात काही शंका नव्हती.<br />
<br />
एकंदरीत कार्यक्रमाच स्वरुप आलेले कलाकार त्यांचे सादरीकरण एकाहुन एक सरस आहेत अर्थात काहींचे अपवाद वगळता.या कार्यक्रमात मुग्धा गोडसे ला परीक्षक म्हणुन घेण्याच प्रयोजन काही लक्षात आल नाही.<br />
मराठीमध्ये उत्तोमत्तम अन गुणी कलाकार उपलब्ध असताना हिला का घेतल हा यक्ष प्रश्न आहे.<br />
<br />
असो ...मला जरा दुसर्या विषयावर बोलायच आहे.<br />
<br />
मागील आठवड्यातील भागात नागपुरच्या सुमेधा नावच्या एका लहानगीने अतिशय छान अशी गोष्ट सांगितली.तिच पाठांतर,गोष्ट सांगण्याची पद्धत सार काही लाजवाब होत.एवढ्या लहानवयात तिच्या मध्ये असणारा सभाधीटपणा, आत्मविश्वास याला मनापासुन दाद द्यायला हवी.<br />
<br />
ती गोष्ट सांगत असताना तिने एक वाक्य म्हणल अन....अगदी सुग्रास जेवणात खडा लागल्यानंतर कस वाटत तस वाटल .ती शायिस्तेखानाची गोष्ट सांगत होती...त्यात तिने अस म्हणल की लालमहालावरुन जे काही सुरु आहे त्यावरुन आता तुम्हीच ठरवा मराठी पाउल पुढे पडते की आहे की मागे???<br />
<br />
वैयक्तीकरित्या मला तरी हे पटल नाही.त्या वादाचा इथे संदर्भ देण्याच प्रयोजन काही समजल नाही.लिहणार्याने हे जाणीवपुर्वक लिहल असेल यात शंका नाही.यात कदाचित प्रामाणिक हेतुही असेन पण मी अशा प्रकारांच्या विरोधात आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टींचा निषेध जरुर करा पण तो व्यक्त करण्यासाठी त्याच माध्यम पण योग्य तेच निवडा.<br />
<br />
ह्या असल्या वादांपासुन आपण आपली भावी पिढी लांबच ठेवली पाहिजे.कारण यानंतर त्यांना पडणार्या प्रश्नांना आपण समाधानकारक उत्तर देउ शकणार आहोत का??<br />
<br />
उदाहरणार्थ....समजा सुमेधा ने जर अशे प्रश्न विचारले तर उत्तर काय देणार...<br />
<br />
जात म्हणजे काय??<br />
<br />
ब्राम्हण म्हणजे कोण??<br />
<br />
मराठा म्हणजे काय???<br />
<br />
सर्व माणस तर सारखीच दिसतात मग ते वेगळे कसे??<br />
<br />
कदाचित याहुन पण अधिक प्रश्न पडु शकतील. आपण या सर्व प्रश्नांना तिच समाधान होइल अशी उत्तर देउ शकणार आहोत का??आम्ही आमच्या भावी पिढीलाही पुन्हा जात/धर्म याच बाळकडु बालपणातच देणार आहोत का??<br />
<br />
यावरुन मला मागील ३ महिन्यापुर्वी आमच्या सोसायटीत घडलेला प्रसंग आठवतोय.आमच्या सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामध्ये साधारण आठ वर्षाच्या मुलीने "आजचा भारत" यावर भाषण केल म्हणजे कोणीतरी लिहलेल ते तिने सादर केल.या कार्यक्रमाला आमच्या परीसरतील एक नगरसेवक हजर होता.त्यामुळे त्या भाषणामध्ये भारत राहिला दुर, त्या नगरसेवकाच्या पक्षाचेच गोडवे गायले होते.त्या नगरसेवकाचा पक्ष किती चांगला आहे,तो नगरसेवक किती आदर्श आहे.पुण्यात बी.आर.टी.पासुन ते उड्डाण पुलांच्या कामांमध्ये कोणी किती भ्रष्टाचार केला इ.इ.बरचस अस बोलत होती.यासगळ्यात वाइट म्हणजे तिच्या प्रत्येक वाक्यावर सर्वजण टाळ्या पिटत होते.<br />
<br />
त्या नगरसेवकाला खुष करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न पाहुन डोक्यात तिडीक आली होती.त्या मुलीच्या वक्ततृत्वाचा किती वाईट रितीने वापर केला गेला होता.अन यात कोणालाच गैर वाटत नव्हत हे दुर्दैव होत.ज्या लोकांना त्या पक्षाचा एवढा कनवाळा होता तर त्यांनी त्याला खुष करण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा होता.<br />
<br />
याच नगरासेवकाला या कार्यक्रमानंतर काही आठवड्यातच एका गुन्ह्याखाली अटक केली गेली होती.आता त्या लहान मुलीवर या सगळ्याचा परीणाम झालाच असेल ना??? तिला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे <br />
तिला मिळाली असतील का??<br />
<br />
आजकालच्या पालक वर्गाला झालय तरी काय?? का ते आपल्या मुलांच बालपण त्यांच्यापासुन हिसकावुन घेत आहेत??अजाणत्या वयातच त्यांना प्रसिध्दी देण्यासाठी अपेक्षांच ओझ त्या कोवळ्या जीवांवर लादत आहेत.<br />
<br />
सगळेच नाही पण बहुतांश पालक हे त्यांच्या मुलांमधील नैसर्गिक कला गुणांऐवजी त्यांना स्वतःला जे हव ते करायला लावतात...त्या कोवळ्या कळ्यांना नैसर्गिक रित्या उमलु द्या त्यांना कृत्रिमरित्या फ़ुलवण्याचा प्रयत्न करु नका. नाही तर अजाणत्या वयातच त्याच आयुष्य कोमेजुन जाइन.<br />
<br />
"लहान तोंडी मोठा घास देउ नका ".....नाही तर भावी पिढी आपल्याला माफ़ करणार नाही.<br />
<br />
<br />
<br />
</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com16tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-77553656890764724932011-02-19T11:12:00.000+05:302011-02-19T11:12:20.882+05:30असा "आदर्श" घेतील का???<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही कार सरकारने देउ केली होती.<br />
<br />
त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.<br />
<br />
हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???<br />
<br />
आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.<br />
<br />
"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.<br />
<br />
हे बदलेल का कधी???<br />
<br />
शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???<br />
<br />
</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com20tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-61366515816150236252011-02-01T18:19:00.015+05:302011-02-01T18:33:57.975+05:30सारथ्य "माणुसकीचे"<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><m:smallfrac m:val="off"> <m:dispdef> <m:lmargin m:val="0"> <m:rmargin m:val="0"> <m:defjc m:val="centerGroup"> <m:wrapindent m:val="1440"> <m:intlim m:val="subSup"> <m:narylim m:val="undOvr"> </m:narylim></m:intlim> </m:wrapindent> </m:defjc></m:rmargin></m:lmargin></m:dispdef></m:smallfrac><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">हजारो कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगपतीच्या ड्रायव्हरचे निधन झाल्यानंतर त्या उद्योगपतीची प्रतिक्रिया काय असेल....त्याला दुःख होईलच</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">,</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">पण आपल्या हातातील कामकाज सोडुन त्याच्या अंत्यविधीसाठी पुण्याकडे हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेणारा आणि ड्रायव्हरने तीस वर्षे सेवा केली म्हणून त्याच्या शेवटच्या प्रवासाचे ड्रायव्हिंग आपण स्वतः करणारा उद्योगपती नुकताच पुणेकरांनी पाहिला.</span><br />
<div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><br />
</div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">आजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;"></span></div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><br />
</div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">पुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन व्हावी ही पुनवाला यांची इच्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;"></span></div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><br />
</div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">ज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;"></span></div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><br />
</div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">यावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... "पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते."</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;"></span></div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0.0001pt;"><br />
</div><div class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0.0001pt;"><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">काल ही बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे तिकडे स्वार्थ</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">,</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">भ्रष्टाचार</span><span style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">,</span><span lang="HI" style="font-family: "Mangal","serif"; font-size: 12pt;">गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे...</span></div></div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com29tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-42629575034813380412011-01-24T12:18:00.000+05:302011-01-24T12:18:10.492+05:30पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
स्वरभास्कर भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....<br />
<br />
स्वर पंढरी आज पोरकी झाली.... :( :(<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwOXH0uD0H6thbz2gs1x-7WV3F9WYEfsD4xKaQ-yrfo2jNu_j2b6pgwyWXICjVUsGgqmsRlsZ8WZw_7IMdwhYPjVfUFhf6uFcZkJifvFFN1ze7uC6Xc54a2JhAZmHWdixWNDHyGSoVbYg/s1600/BJ.jpg" imageanchor="1" linkindex="33" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="257" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwOXH0uD0H6thbz2gs1x-7WV3F9WYEfsD4xKaQ-yrfo2jNu_j2b6pgwyWXICjVUsGgqmsRlsZ8WZw_7IMdwhYPjVfUFhf6uFcZkJifvFFN1ze7uC6Xc54a2JhAZmHWdixWNDHyGSoVbYg/s320/BJ.jpg" width="320" /></a></div><br />
<br />
पंडीतजींचा फ़ोटो जालावरुन साभार.</div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-67251344068571311352011-01-16T13:25:00.007+05:302011-01-16T13:33:30.948+05:30मोदींचा गुजरात...साधारण एक तीन वर्षापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त अहमदाबादला राहण्याचा योग आला होता.तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रसारमाध्यमातुन दोन प्रकारच्या प्रतिमा रंगवल्या जात होत्या काहींना ते "मसीहा" वाटत होते तर काहींना ते "खलनायक" वाटत होते.त्यामुळे नरेंद्र मोदी ह्या रसायनाविषयी मनात कमालीची उत्सुकता होती.अहमदाबादला विमानतळावर उतरलो तेव्हा हॉटेलवर घेउन जाणार्या चालकाला सहज मोदींविषयी विचारलं....<br />
<br />
"अरे भैय्या, आपके ए नरेंद्र मोदीजी कैसे इन्सान है?? आपको क्या लगता है??"<br />
<br />
यावर त्याच उत्तर होत..<br />
<br />
"साब, थोडे दिन में गुजरात के घर घर में मोदीजी तस्बीर होगी.बडा सच्चा इन्सान है।"<br />
<br />
एका सामान्य माणसाच्या नजरेतुन ही मोदींची प्रतिमा होती. नुकतच "वायब्रंट गुजरात" झाल त्यातुन गुजरात मध्ये येणारे उद्योजक सर्व उद्योजकांनी मोदींबद्दल काढ्लेले गौरवोद्गार....हे सगळ पाहिल्यावर मला त्या चालकाची आठवण आली त्यावेळी त्याने काढलेले उद्गार नक्कीच खरे झाले आहेत.अभिमान वाटावा अशीच कामिगिरी नरेंद्र मोदींनी करुन दाखवली आहे.तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काय करु शकता हेच मोदींनी दाखवुन दिल आहे.<br />
<br />
विरोधक आज मोदींच्या नावाने कितीही कंठशोष करीत असले तरी सत्य परिस्थिती लपुन राहत नाही.आज मोदींवर सामान्य नागरिकापासुन ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पर्यंत प्रत्येकाचाच मोदींवर विश्वास आहे.याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदींच्या फ़क्त एका एस.एम.एस.वर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला.<br />
<br />
हा विश्वास एका रात्रीतुन आलेला नाही त्यामागे मोदींची विकासाची दुरदृष्टी, त्यांनी घेतलेले कष्ट. त्यांचे विकासासाठी केलेले नियोजन,कुशल नेतृत्व हे सार काही आहे.राज्यामधील मुलभुत गरजांवर केलेला विकास.<br />
<br />
मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यांनी "ज्योतीग्राम" योजनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्य भारनियमन मुक्त केल.गुजरातमधील वीजचोरी रोखली.सामान्य शेतकर्यापर्यंत पोहचले त्यांचे मुद्दे पटवुन दिले अन महत्वाच म्हणजे सर्वांना ते पटल त्याचचं फ़ळ त्यांना मतपेटीतुन मिळाल.<br />
<br />
त्यानंतर सरदार सरोवराच्या माध्यमातुन पाण्याचा प्रश्न सोडवला. सरदार सरोवराच्या विरोधात असणार्या पर्यावरणवाद्यांना ते पुरुन उरले.नर्मदेच्या पाण्याचा अगदी योग्य पद्धतीने नियोजन अन उपयोग करुन पाण्याचा प्रश्न सोडवला.<br />
<br />
दळणवळणाचा प्रश्न हाती घेतला.गुजरात मधील रस्ते जर पाहिले तर एकदम चकाचक.अगदी खेड्यातील रस्ते सुद्धा व्यवस्थित आहेत.थोडक्यात काय तर मोदींनी ज्या मुलभुत गरजा आहेत म्हणजे रस्ते,वीज अन पाणी यावर अगदी नियोजनबध्द काम केल. पण हे सार करताना सर्व कामगार अगदी पारदर्शक कुठे सुद्धा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही.<br />
<br />
उद्योजकांना फ़क्त सुविधाच नाही तर पारदर्शक कारभाराचा विश्वास पण दिला त्यामुळेच कोणतही काम किंवा योजना लालफ़ितीच्या कारभारात अडकत नाही.संपुर्ण शासकीय यंत्रणेवर मोदींचा वचक आहे.त्यामुळे सर्व काम कशी फ़टाफ़ट होतात.<br />
<br />
आजमितीला नरेंद्र मोदी खरोखर "विकासपुरुष" झाले आहेत.<br />
<br />
हे सगळ पाहताना माझ मन नकळत महाराष्ट्रात काय चालु आहे याचाच विचार करत होत.गुजरात ज्या वेगाने पुढे जात आहे त्याच वेगाने आपली अधोगती चालु आहे.भ्रष्टाचार,जाती-पातीच राजकराण,भाषावाद,बाबुगिरी यासगळ्यात महाराष्ट्र भरडला जात आहे.जे मोदींना गुजरात मध्ये शक्य आहे ते महाराष्ट्र मध्ये एकाही नेत्याला किंवा पक्षाला शक्य नाही.स्वतःच्या तिजोर्या भरण्यात मश्गुल असणारे नेते ह्या स्वराज्यात निपजले आहेत हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे.<br />
<br />
काही दिवसांपुर्वीचा एक घटना आठवते आहे....जेव्हा आदर्श अन इतर गोष्टींवरुन महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा चालु होता तेव्हा मोदी मुंबई मध्ये गुजरातसाठी एक रोड शो करुन गेले होते.त्याची साधी दखल सुद्धा आपल्या नेत्यांनी घेतली नव्हती.तेव्हा महाराष्ट्रात चालु असणार्या घडामोडींबद्दल एकही टिप्पण्णी केली नाही...ते आले...त्यांनी पाहिल...अन ते जिंकले.यातुनच ते किती धुरधंर राजकारणी आहेत हे दिसुन येत.<br />
<br />
महाराष्ट्रालाही असाच एक नरेंद्र मोदी लाभो हीच सदिच्छा.<br />
<br />
जाता..जाता...खाली दोन दुवे देत आहे ते जरुर पाहा...पहिला आहे गुजरात राज्य सरकारचा अन दुसरी महाराष्ट्र सरकारचा...मग मी जे वर म्हणलोय ते नक्की पटेल.<br />
<br />
गुजरात राज्य सरकार :<br />
<a href="http://www.gujaratindia.com/index.htm">http://www.gujaratindia.com/index.htm</a><br />
<br />
महाराष्ट्र राज्य सरकार:<br />
<a href="http://maharashtra.gov.in/">http://maharashtra.gov.in/</a>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-31059812095753615412011-01-15T09:54:00.000+05:302011-01-15T09:54:37.046+05:30मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...सर्व ब्लॉगर्स मित्र, वाचक अन त्यांच्या परीवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...<br />
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkCZS75TL5tRxBZiXnmU3naX4YrjM1l3vktlqR666v1J3vsEnI7jsmsL2Oo2UtNXq05YMucV-Iekm-jJfrgjhDgrFYNvZXFDhinUWjT8JHDGSPs3-_L5OOTQmXcgKTvEOzxGfPACfLZus/s1600/untitled.bmp" imageanchor="1" linkindex="11" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="318" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkCZS75TL5tRxBZiXnmU3naX4YrjM1l3vktlqR666v1J3vsEnI7jsmsL2Oo2UtNXq05YMucV-Iekm-jJfrgjhDgrFYNvZXFDhinUWjT8JHDGSPs3-_L5OOTQmXcgKTvEOzxGfPACfLZus/s320/untitled.bmp" width="320" /></a></div><br />
<br />
<br />
<br />
<br />
शुभेच्छा पत्र <b><a href="http://www.chitrakavita.com/" linkindex="12">चित्रकविता </a></b>वरुन साभार.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-56114730262131398472011-01-13T23:25:00.003+05:302011-01-15T13:22:37.229+05:30पहिल बक्षीस..दोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.<br />
<br />
<br />
<br />
या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...<br />
<br />
"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र."<br />
<br />
हे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.<br />
<br />
यानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का??? <b>२५ पैसे.</b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgADRMPa8T_728roaXuSkrII3GA0faL4iUPwEy3evUhmNFTXmPRml7Hgs0M5H2jkInLJhImBCpgaAo4E2lmzqfAH_h9qeTB0QsimXjPc4KkT6-eiNmip_dniCXxxQ0qMVV3NYXoGwSeNiU/s1600/300_08169992ec58aa06L.jpg" imageanchor="1" linkindex="35" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgADRMPa8T_728roaXuSkrII3GA0faL4iUPwEy3evUhmNFTXmPRml7Hgs0M5H2jkInLJhImBCpgaAo4E2lmzqfAH_h9qeTB0QsimXjPc4KkT6-eiNmip_dniCXxxQ0qMVV3NYXoGwSeNiU/s200/300_08169992ec58aa06L.jpg" width="190" /></a></div><br />
<br />
अन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.<br />
<br />
मला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.<br />
<br />
त्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.<br />
<br />
आजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-80155104906629386942011-01-13T00:08:00.010+05:302011-01-13T00:15:55.036+05:30????लेखाच शीर्षक पाहुन तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल ना....पण हा मला पडलेला प्रश्न आहे. (यात काय नवीन ते तर नेहमीचचं आहे)<br />
<br />
आज संध्याकाळी "सकाळ" (हो सकाळ संध्याकाळीच वाचतो) वाचायला घेतला तर "राजीव गांधीं राष्ट्रीय पारितोषिक" याची मोठी जाहिरात दिसली.मग सहज विचार केला आपल्या देशात सरकारची कोणती पण योजना ही फ़क्त राजीव गांधी,इंदिरा गांधी अन पंडीत नेहरु या तीन नावांभोवतीच का घुटमळते???<br />
<br />
जरा हे पहा...<br />
१.राजीव गांधी राष्ट्रीय पारितोषिक योजना<br />
२.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना<br />
३.राजीव गांधी उद्योग मित्र योजना (लघु उद्योजकांसा्ठी)<br />
४.राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना<br />
५.राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना <br />
६.RAJIV GANDHI NATIONAL CRÈCHE SCHEME FOR THE CHILDREN OF WORKING MOTHERS<br />
७.<span id="search" style="visibility: visible;"><i>Rajiv Gandhi Scheme</i> for Empowerment of Adolescent Girls</span><br />
<span id="search" style="visibility: visible;">८.इंदीरा आवास योजना</span><br />
<span id="search" style="visibility: visible;">९.इंदीरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना </span><br />
<span id="search" style="visibility: visible;">९.जवाहरलाल नेहरु रोजगार योजना</span><br />
<span id="search" style="visibility: visible;">१०. जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजना</span><br />
<span id="search" style="visibility: visible;"> </span><br />
<span id="search" style="visibility: visible;">ह्या उदाहरणादाखल दिलेल्या काही योजना आहेत.या योजनांमध्ये करोडो रुपये ओतले जातात ते पण तुम्ही आम्ही भरणार्या करातुनच.याचा खर्या गरजुंना किती लाभ होतो याबद्द्ल शंकाच आहे.असो तो वेगळाच मुद्दा आहे त्यावर वेगळीच पोस्ट होऊ शकते.</span><br />
<span id="search" style="visibility: visible;"><br />
</span><br />
<span id="search" style="visibility: visible;">तर मी काय म्हणत होतो ...राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार जेव्हा कधी योजना जाहीर करतात ती या तीन नावांच्या पलीकडे कधीच जात नाही.भगतसिंग,राजगुरु किंवा लालबहाद्दुर शास्त्री यांच्या नावाने कधी कोणती योजना ऐकली आहे का हो??(माझ्या तरी ऐकण्यात नाही एखादी असेल तर जरुर सांगा)<br />
<br />
ह्या तीन व्यक्ती सोडल्या तर भारतात अशी एक पण लायक व्यक्ती झालीच नाही का??<br />
<br />
सरकारी योजना तर सोडाच रस्ते, उड्डाणपुल,सरकारी दवाखाने, विमानतळ,जलाशय,संग्राहलये, उद्याने काही असो यांची नाव असलीच पाहिजे.सगळीकडे यांच्याच नावाचा उदो उदो करुन सरकारला नक्की साधायच तरी काय आहे??<br />
<br />
आज भारतातल्या खेडोपाडी मुलभुत सुविधा पोहचल्या नाहीत पण ह्या तीन नावांच्या रुपाने कोणती ना कोणती योजना मात्र नक्कीच पोहचली आहे.यामागच राजकारण न समजण्या इतपत भारतीय मुर्ख आहेत का???</span><br />
<span id="search" style="visibility: visible;"><br />
</span><br />
<span id="search" style="visibility: visible;">फ़क्त योजना जाहिर करुन मुलभुत गरजा अन विकास साधता नाही.खरोखर विकास साधायचा असेल तर तो वातानुकुलीत खोलीत चर्चा झोडुन साधता येत नाही त्यासाठी खेडॊपाड्यात पोहचुन काम करण्याची गरज आहे हे ज्या दिवशी राजकारण्यांना कळेल तेव्हाच याच उत्तर मिळेल.</span><br />
<br />
<span id="search" style="visibility: visible;"><b>विरोध हा नाव देण्याला नाही तर त्याच्या मागुन केल्या जाणार्या राजकारणाला आहे.</b><br />
</span><br />
<br />
<span id="search" style="visibility: visible;"><br />
</span><br />
<span id="search" style="visibility: visible;"><br />
</span>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-59171393778634183612011-01-11T11:47:00.001+05:302011-01-11T11:54:58.065+05:30संदीपची कविता....संदीप खरे.....बस्स नाम ही काफ़ी है...<br />
<br />
तशी संदीपची प्रत्येक कविता आवडते पण ही एक मला प्रचंड आवडणारी कविता.<br />
<br />
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो<br />
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...<br />
<br />
शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती<br />
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...<br />
<br />
ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे<br />
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...<br />
<br />
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया<br />
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...<br />
<br />
गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला<br />
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...<br />
<br />
मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा<br />
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...<br />
<br />
काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी<br />
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...<br />
<br />
-संदीप खरे.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-69018560894295842562010-12-31T00:08:00.007+05:302010-12-31T00:15:07.647+05:30"स्वप्नपुर्ती" च वर्ष.... २०१० सरलं...नवीन वर्ष नवे संकल्प....आयुष्याच्या वाटेवर अशीच वर्षे सरत जातात पण त्यातील काही आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरली जातात.कारण त्या वर्षात तुम्हाला जे हव ते मिळालेल असत किंवा नशीबाचं घोड चौखुर उधळल्यामुळे अवघी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असतात.<br />
<br />
आयुष्यातले स्ट्रगल्स, स्वप्न साकार करण्यासाठी अनुभवलेले कटु क्षण किंवा असा एक काळ असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडाव लागत.अन जर तो संघर्ष मोठा असेल तर त्यानंतर मिळाणार्या यशाचं सुख हे अवर्णनीय असतं.<br />
<br />
असच काहीसं या वर्षात झाल...माझ्यासाठी तर २०१० म्हणजे स्वप्नपुर्तीच वर्ष आहे.या वर्षाने मला खुप अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत.<br />
<br />
या वर्षात मला माझ्या आयुष्याची जोडीदार मिळाली...करीअर मध्ये बर्याच स्ट्रगल नंतर मला हवा असणारा माइल स्टोन गाठता आला..अन याहुन सर्वात मोठ म्हणजे माझ लहानपणापासुन पाहिलेल स्वप्न तब्बल अडीच वर्षांच्या धडपडीनंतर साकार झाल ते म्हणजे माझ्या आइ बाबांसा्ठीच घर.<br />
<br />
माझ्या आई अन बाबांनी अवघ्या १० बाय १० च्या खोलीत तब्बल १८ वर्षे संसार केला. तेव्हाच लहानपणी मनाशी निश्चय केला होता आई - बाबांसाठी एक घर भेट देईन. अन त्या घराच नाव असेन<b> स्वप्नपुर्ती</b><br />
<br />
आज आम्ही भावंड जे काही आहोत ते केवळ आई अन बाबांमुळेच ...आयुष्यात त्यांनी आमच्यासाठी खुप सार्या तडजोडी स्वीकारल्या त्याही अगदी आनंदाने.लहान असताना त्याच महत्व कधीच कळाल नाही पण जस जस मोठ होत गेलो व्यवहाराची जाण आली तस त्यांच्या सारख्या तडजोडी करण्यासाठी किती धैर्य लागत याची जाणीव झाली.<br />
<br />
१५ मे ला म्हणजे माझ्या लग्नाच्या एक दिवस अगोदर जेव्हा आई-बाबांनी गृहप्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहर्यावरील असलेलं समाधान पाहिल अन भरुन पावलो.त्या संपुर्ण दिवस जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक सहकारी घर पाहण्यासाठी यायचे तेव्हा डोळ्यात माझ्यासाठी असलेला अभिमान ,चेहर्यावरील समाधान ही माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ होती.तेव्हा मनात एकच भावना होती आई बाबा ही फ़क्त सुरुवात आहे ....आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जी काही सुख नाकारली ते प्रत्येक सुख मी तुम्हाला देइन.अजुन खुप करायच आहे तुमच्यासाठी...तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत त्यापुढे माझ हे कर्तृत्व खुप कमी आहे.<br />
<br />
घराच स्वप्न साकारायला मी डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी सोप वाटणार काम किती कठीण आहे एका आठवड्यात लगेच समजल कारण माझ्या समोरील प्लॉट वाल्याने अतिक्रमणाची खोटी केस लावली.ते प्रकरण निस्तरायला मला सहा महिने गेले.कधी नव्हे ते कोर्टाची पायरी चढलो.आता तरी काम पटकन होईल अस वाटत असताना बांधकाम कंत्राटदाराने त्रास द्यायला सुरुवात केली. मी फ़क्त शनिवार -रविवार साईट वर जायचो इतर दिवशी गावाकडील मित्र त्यांना शक्य होइल त्याप्रमाणे साइटवर जायचे याचाच त्याने गैरफ़ायदा घेउन त्रास द्यायला सुरुवात केली.चांगुलपणाची सर्व कपडे उतरवुन जेव्हा धतिंगपणा केला तेव्हा कुठे तो नीट काम करायला लागला.<br />
<br />
त्यातही काम करताना मी भरपुर वेळा तोडफ़ोड केली.सोमवार ते शुक्रवार तो काम करायचा अन शनिवार-रविवार मी गेल्यावर बर्याचदा त्याला तोडायला लावायचो.कारण मी दिलेल डीजाइन दिलेल एक असायच अन त्याने बांधलेल वेगळच असायच. अस तोड फ़ोडीत काम आपल चालु होत.अशे २-३ महिने गेले अन मी वैतागुन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.दुसर्या चांगल्या कंपनीत कमी पगारावर जॉइन केल. अर्थात सहा महिन्यानंतर मला हवी असलेली सॅलरी मिळेल या अटीवर.<br />
<br />
जुन्या कंपनीमध्ये जिथे मी अगदी पोटतिडकीने काम करुन कंपनी वाढवली त्यांनीच माझे सर्व पैसे बुडवले.आर्थिक दृष्ट्या तो मला खुप जोरात झटका बसला.आता नवीन जॉब असल्यामुळे कर्ज पण नाही हक्काची कमाइ पण नाही.पुन्हा एकदा सहा महिने काम बंद करण्याची वेळ आली.<br />
<br />
नव्या कंपनीत प्रोबेशन पुर्ण केल अन लगेच कर्जासाठी अर्ज केला.नव्या कंपनीने सुध्दा त्यांचा शब्द पाळला नाही.त्या दरम्यान मंदी असल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.परत काम चालु करायला मला दोन महिने लागले.कासवाच्या गतीने मी घराच काम सुरु केल.ऎन पावसाळा असल्याने काम तस हळु हळु चालु होत.२००९ च्या दिवाळीपर्यंत स्लॅब अन सर्व बांधकाम झाल आता फ़िनीशिंग चालु होणार तेव्हाच मला तीन महिन्यासाठी इजिप्तला जाव लागंणार होत.त्या दरम्यानच माझी<a href="http://manmaujee.blogspot.com/2009/12/blog-post_30.html"> <b>विकेट पण पडली</b></a>.सर्व गोष्टी एका वेळीच सुरुवात झाली होती. पण फ़क्त काही झाल तरी हरायच नाही अन खचायच तर बिलकुल नाही हेच फ़क्त मनात होत.<br />
<br />
हे काय कमी होत..पुढ अजुन एक मोठ संकट माझ्या समोर उभ राहिल...मी कैरोला असताना बाबांना अॅटॅक आला अन त्यांची अॅन्जिओप्लास्टी करावी लागली.आता मात्र मी खचलो होतो.माझ्यासाठी तो खुप कठीण काळ होता.तेव्हा केवळ मित्रांच्या आधारामुळेच उभा राहु शकलो.यावर<a href="http://manmaujee.blogspot.com/2009/12/blog-post.html"> <b>ही</b></a> पोस्ट पण लिहली होती.<br />
<br />
या सर्व घटनातच २००९ संपल अन २०१० सुरु झाल अन सार काही बदलल....जानेवारी मध्ये मी परत आलो.....आर्थिक अडचण पण सुटली होती त्यामुळे काहीच अडथळा नव्हता...पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरु केल...अवघ्या तीन महिन्यात मी संपुर्ण घर पुर्ण केल. . . १६ मे ला लग्न झाल. . . .मग माझ्यासाठी माझ जगच बदलुन गेल.<br />
<br />
जुलै मध्ये कंपनीवाल्यांना उपरती झाली अन माझ्याबाबतीत झालेली चुक मान्य करीत माझ पॅकेज अनपेक्षीत रितीने अपडेट केल.सार कस सुरळीत झाल. . . .मागच्या वर्षातील दिवस आठवले की खुप समाधान मिळत.<br />
थोडक्यात काय<b> "घर पाहाव बांधुन अन लग्न पाहाव करुन"</b> अशे दोन्ही पण अनुभव मी एकाच वेळी घेतले. :)<br />
<br />
तुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. . आता समजल ना ;) )<br />
<br />
आता २०११ च स्वागत करायच पुन्हा एक नव स्वप्न,नवी उमेद , नवी आशा घेउन. . . . अन अर्थात मनमौजी पणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगयाच.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com35tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-91795409675454555702010-12-24T22:14:00.006+05:302010-12-24T22:24:26.628+05:30पुण्यात गाडी चालवायची आहे का????<b>प्रसंग क्रमांक १:</b><b><br />
</b><br />
स्थळ : कात्रज सर्पोद्यान.<br />
<br />
मी आणि मित्र पुण्याच्या बी.आर.टी. वर बौ्द्धिक करत चाललो होतो. सर्पोद्याना समोरील चौकात गतिरोधक आल्यामुळे मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. अन क्षणात पाठीमागुन येणार्या एका महान दुचाकीस्वाराने धडक दिली. काही समजायच्या आत मी रस्त्यावर अन मित्र दुचाकी सोबत घसरत पुढे जाउन पडला.आमची काही चुक नसतानाही आम्हाला न मागता चांगलाच प्रसाद मिळाला होता.<br />
<br />
<b>प्रसंग क्रमांक २</b><br />
<br />
स्थळ : के.के. मार्केट चौक<br />
<br />
सकाळी नेहमीप्रमाणे हाफ़िसात निघालो होतो..के.के.मार्केटच्या चौकात बिबवेवाडीकडे जाण्यासाठी लाल दिवा पेटल्याने थांबलो.हिरवा दिवा पेटताच उजवीकडे वळुन मी आपला मार्गस्थ झालो. तोच समोर एक काकु सिग्नल तोडुन माझ्यासमोर आली. धडक वाचवण्यासाठी मी ब्रेक लावले तोच पा्ठीमागुन येणार्या चा्रचाकी वाल्याने माझ्या गाडीच हलकसंच चुंबन घेतल.एवढ होऊनही काकु काहीही न घडल्याच्या अविर्भावात साळसुदपणे निघुन गेल्या.<br />
<br />
हे मागील काही महिन्यातील मला आलेले अनुभव...तसा गाडी चालवण्याच्या बाबतीत मी म्हणजे कासव आहे.आमचा स्पीड ४०-४५ च्या पुढे कधीच जात नाही.<br />
<br />
एकदंरीत आता तुमच्या लक्षातच आल असेल पुण्यात गाडी चालवण म्हणजे सर्वात मोठ दिव्य आहे. एकवेळ तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल पण अष्टांगअवधानी असणं अत्यंत गरजेचे आहे.कारण फ़क्त आभाळातुन सोडल तर इतर कोणत्याही दिशेने ्म्हणजे समोरुन, पाठीमागुन, उजवीकडुन, डावीकडुन अन असतील नसतील त्या फ़टीतुन कधी कोण घुसेल हे कोणीच सांगु शकत नाही.<br />
<br />
<b>पुण्यातील वाहनचालकांच्या काही सवयी व समज :</b><br />
<br />
१. रस्त्यावरील सिग्नल म्हणजे हे केवळ रस्ता सजावटीसाठी आहे.<br />
२. ३० सेकंदाचा सिग्नल जर पाळला तर महाप्रलय होऊ शकतो त्यामुळे पिवळा/लाल सिग्नल दिसताक्षणी शक्य तितक्या वेगाने मिळेल त्या फ़टीतुन दुचाकी ही पळवलीच पाहिजे.<br />
३.बी.आर.टी. ट्रॅक किंवा सायकल ट्रॅक यामधुन गाडी चालवणे हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे.<br />
४. समोर वाहतुकीची कोंडी झालेली आहे मार्ग निघु शकत नाही अश्या वेळी आजुबाजुच्या जनतेच्या मनोरंजनासाठी आपल्या दुचाकीचा भोंगा जोरात वाजवलाच पाहिजे.<br />
५. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवणे हे अतिशय कमीपणाचे अन अडाणीपणाचे लक्षण आहे त्यामुळे गाडी ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे किंवा त्यावरच थांबवली गेली पाहिजे.<br />
६.सिग्नलला थांबल्यानंतर एकाजागी सिग्नल सुटण्याची वाट पाहण्याऎवजी मिळेल त्या कोपर्यातुन आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करायचा.<br />
७.एका कानाला मोबाईल लावुन,मान तिरकी करुन गाडी चालवण्यात खर शौर्य आहे.<br />
८. नो एन्ट्रीचा फ़लक दिसत असला तरी त्यातुन गाडी घातलीच पाहिजे त्यात खर थ्रिल आहे अन वर कोणी एखादा ओरडला तर त्याच्यावरच शिरजोरी करायची.<br />
९.जर चारचाकी असेल तर मध्ये रस्त्यातच उभी करुन चितळेंच्या किंवा तत्सम दुकानात जाउन निवांतपणे खरेदी करायची भले तिकडे कितीही ट्रॅफ़िक जॅम झाला तरी चालेल.<br />
१०.हेल्मेट हे फ़क्त फ़ट्टु किंवा भित्री लोक वापरतात.<br />
<br />
<b>पुण्यात गाडी चालवताना यांच्यापासुन सावधान:</b><br />
<br />
<b>१. पी.एम.टी. :</b> गाडी चालवताना पी.एम.टी. जेव्हा कधी पुढे किंवा मागे येते तेव्हा मला नेहमी ती एका अजस्त्र अजगरासारखी वाटते की जो भुकेला आहे अन कधीही तुमची शिकार करु शकतो. शक्यतो गाडी चालवताना पी.एम.टी.च्या जवळपास पण भटकु नका कधी तुमची शिकार होइल हे सांगता येणार नाही. पी.एम.टी. अगदी सन्मानाने जाउन द्यायच अन मग आपण निघायच.<br />
<br />
<b>२. पुणेरी काकु</b> (यात मुली सुध्दा आल्या बरं का) : यांना इंडीकेटर, हॉर्न या प्रकारांची अॅलर्जी असते. त्यामुळे या जर आजुबाजुला असतील तर कधी टर्न करतील हे साक्षात ब्रम्हदेवपण सांगु शकत नाही. यांनी चुकुन कधी इंडीकेटर दिला तरी जरा जपुनच कारण डावीकडचा इंडीकेटर देउन उजवीकडे वळण्याचा पराक्रम फ़क्त पुण्यातच होतो.<br />
<br />
<b>३.रिक्षावाले:</b> पुणेकर रिक्षावाले काका हे पुण्यातील रस्तांचे अनिभिषक्त सम्राट म्हणा किंवा वतनदार म्हणल तरी चालेल.स्वतः चुक करतील अन वर तुम्हालाच सुनावतील.हे पण रस्त्यात प्रवाशी घेण्यासाठी किंवा प्रवाशी उतरवण्यासाठी केव्हाही थांबु शकतात. सिग्नल पाळण्याच कोणतही बंधन यांच्यावर नसतं.रस्ता कोणताही असो त्याचे मालक हे हेच असतात.<br />
<br />
<b>४.पुणेरी खड्डे:</b> पुणे तिथे काय उणे या उक्तीनुसार पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची कमतरता नाही. पुण्यात असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डा नाही.पुण्यात एकसारखा सलग रस्ता तुम्हाला सापडुच शकत नाही, सतरा पक्षांची खिचडी करुन ज्याप्रमाणे सरकार उभारणी साठी आघाडी केली जाते त्याप्रमाणेच पुण्यात पण अशेच रस्ते आढळतील. कॉंक्रीट, डांबरी, पेवांग ब्लॉक अश्या सर्व प्रकारचे रस्ते एकाच वेळी तुम्हाला आढळतील.त्यामुळे शक्यतो खड्ड्यांमधुन जो काही थोडा फ़ार रस्ता असतो त्यावरुन गप गुमान आपली गाडी चालवायची.<br />
<br />
<b>५.पुणेकर पादचारी:</b> चौकातुन गाडी चालवताना यांच्यापासुन जरा जपुनच राहयच.एखाद्या बगीच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे फ़ेरफ़टका मारतो अगदी त्याप्रमाणेच रहदारीच्या रस्त्यावर हे मुकतपणॆ बागडत असतात.चुकुनही यांच्या मार्गात येउ नका (ते तुम्हाला आडवे आले तरी) नाही तर अस्सल पुणेरी फ़टके मिळतील.अन अश्यावेळी तुमच्यावर तोंडसुख घ्यायला हौशे,गवशे,नवशे अशे सगळे सामील होतील.<br />
<br />
थोडक्यात काय तर पुण्यात गाडी चालवायची असेल तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षक हे लक्षात ठेवा नाही तर कधी तुम्हाला मुक्ती मिळेल हे कोणी सांगु शकत नाही.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com23tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-72661927741716182962010-11-04T22:25:00.004+05:302010-11-04T22:33:18.670+05:30दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!<span class="Yd"><span class="ze">तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, <br />
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, <br />
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, <br />
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, <br />
<br />
<b>दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!</b></span></span><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3OLk8E3QG4TehFEEA606eWHpM-zh3m45udlb9EYgE-vSs4wQHz73USZaU7NRpNWfVtdl_IiaFwLKFWYo70AYKT_KBJW8dXRIWnkr6QP1NilQmgs8wNZrUsjj_BSBv5l7xSMBIjVWztJI/s1600/diwali3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3OLk8E3QG4TehFEEA606eWHpM-zh3m45udlb9EYgE-vSs4wQHz73USZaU7NRpNWfVtdl_IiaFwLKFWYo70AYKT_KBJW8dXRIWnkr6QP1NilQmgs8wNZrUsjj_BSBv5l7xSMBIjVWztJI/s400/diwali3.jpg" width="400" /></a></div><br />
<span class="Yd"><span class="ze"><b> </b></span></span>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-70196299375544159492010-10-17T12:40:00.004+05:302010-10-17T12:44:31.242+05:30दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjK7r6gWgNgtQXjVwX9p4dSj8nx1JNvNn6GytJDSeyI1ZvGBkjm1bsv2OUVcrQPwvjtGaAYjIFy4cIRIkDXPa2BMBfp_b9CJRlP0jHU9SDlxr5-lEjUho3Z6auXplYrjV2PrX6fphsqjLI/s1600/bi_dussehra_08_sep_22_162502.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjK7r6gWgNgtQXjVwX9p4dSj8nx1JNvNn6GytJDSeyI1ZvGBkjm1bsv2OUVcrQPwvjtGaAYjIFy4cIRIkDXPa2BMBfp_b9CJRlP0jHU9SDlxr5-lEjUho3Z6auXplYrjV2PrX6fphsqjLI/s320/bi_dussehra_08_sep_22_162502.jpg" width="320" /> </a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br />
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br />
</div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;"><span style="color: orange;">ब्लॉगच्या सर्व वाचकांना व मित्रपरीवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!! </span></span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><br />
</div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: small;">शुभेच्छापत्र <a href="http://greetings.webdunia.com/marathi/dussehra/card499.html">वेबदुनिया</a> वरुन साभार.</span></div>Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-76592252556569698782010-09-30T14:36:00.001+05:302010-09-30T14:41:15.416+05:30मुस्कान...मुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.<br />
<br />
सतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन "आनंद" देणारी ही मुस्कान.<br />
<br />
आपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे काय??हे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.<br />
परवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.<br />
<br />
<br />
ती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी तिच्या चेहर्यावर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.<br />
<br />
तिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.<br />
तिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.<br />
हे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.<br />
हे अस का असत???<br />
खरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का???<br />
असेल तर तो असा न्याय का करतो???Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-53885614439484492382010-09-27T12:25:00.003+05:302010-09-27T12:30:33.159+05:30तिकोना ट्रेक...सिंहगड,विसापुर मागच्या वेळी असे दोन्ही पण ट्रेक चुकले होते त्यामुळे ह्या वेळी काही करुन जायचचं असं ठरवल होत.ट्रेकला शनिवारी की रविवारी जायचच यावरुन मतदान झाल त्यात शनिवारला (२५ सप्टे.)बहुमत मिळाल.इथेच मोठी गोची झाली कारण २५ ला मला सुट्टी नव्हती त्यामुळे सुट्टीसाठी काहीतरी जुगाड कराव लागणार होतं.सुदैवाने तस झाल पण सुट्टी मिळुन गेली. पण तरीही काही तरी काम निघुन ऐनवेळी हाफ़िसला जाव लागल तर?? अजुन काही अडचण झाली तर?? एक ना अनेक अश्या खुप शंका मनात येत होत्या.<br />
<br />
पुण्याहुन येणारे आम्ही पाच लोक होतो त्यामुळे गाडी करुन जाउ या अस अगोदर ठरल होत परंतु गाडी पेक्षा बाईकवर जाणं जास्त सोयीच राहिल त्यामुळे मी अन सागर. अनिकेत, अभिजीत अन विकास अशे पाच जण मिळुन तीन बाईकवर जाउ या अस ठरल.<br />
<br />
आता महत्वाच काम म्हणजे बाईक शोधायच ती जबाबदारी सागर सदगुणी मुलावर दिली.भरपुर प्रयत्न करुनही त्याला बाईक मिळाली नाही.तरी पण पठ्ठ्याने प्रयत्न सोडले नव्हते....शुक्रवारी रात्री मी साधारण ८.३० ला या सासमु ला फ़ोन केला तेव्हा आमचा झालेला संवाद असा..<br />
मी: अरे काय झाल...मिळाली का बाईक??<br />
सासमु: नाही रे...मित्राची बाइक नाही मिळत आहे.<br />
मी: बर ठीक आहे...आपण स्कुटीवर जाउ रे...टेन्शन घेउ नकोस<br />
सासमु: चालेल...बघु रात्री १२ वाजता मी मित्राकडे जाउन येतो...त्याने दिली तर बघु या.<br />
(आता रात्री १२ ला कोणत्या मित्राकडे गेला होता हे विचारु नका...तो सदगुणी आहे)<br />
मी:वक्के...फ़क्त मला तस कळव.<br />
<br />
एकुणच रागरंग पाहुन मी स्कुटीवर जाव लागणार याची तयारी सुरु केली...अपेक्षेप्रमाणेच सासमु चा सकाळी ६.३० ला समस आला बाईक मिळाली नाही तुझी स्कुटी घेऊन ये...आपण स्कुटीवरच जाउ या....त्याला ७.१५ला वाकडला पोहच असा रिप्लाय धाडुन दिला.<br />
<br />
मी साधारण ७.४५ ला वाकडला पोहचलो तत्पुर्वीच अनिकेत आणि मंडळी पोहचली होती.मला उशीर होण्याच कारण म्हणजे...वारजेच्या पुलावरुन थोड पुढे आल्यानंतर भटक्या वाजला म्हणुन रस्त्याच्या कडेला थांबलो होतो तोच तिथे एक काका पाठीमागुन आले...त्यांच्या बाईकमधील पेट्रोल संपल होतं..एकंदरीत त्यांची अवस्था पाहुन बर्याच दुरुन गाडी ढकलत आले आहेत अस दिसत होत...त्यांना थोड पेट्रोल हव होत...मी टाकी नुकतीच संपुर्ण भरली होती त्यामुळे मला पेट्रोल द्यायला काहीच अडचण नव्हती पण स्कुटीमधुन पेट्रोल काढायच कस हाच प्रश्न होता...थोडा फ़ार प्रयत्न केला पण यश काही मिळाल नाही...मलाही वेळ होत होता त्यामुळे त्यांनी तु जा मी बघतो अस म्हणल्यावर मी तिथुन निघालो....वाकडला पोहचलो तर सासमु सोडुन सगळे पोहचले होते. सासमु ला फ़ोन केला तर साहेब अजुनही होस्टेलवरच होते... "अरे तुम्ही पोहचलात काय???तुमच्याच फ़ोनची वाट पाहत होतो...१५ मिनीटे थांबा आलोच मी." अस उत्तर मिळाल्यावर आम्ही समजुन घेतल स्वारी लवकर काही येत नाही त्यामुळे तिथे बाजुलाच गाड्या लावुन आम्ही गप्पा टप्पा चालु केल्या. अखेरीस सासमु आठ वाजता पोहचला....त्यानंतर आम्ही कामशेतच्या दिशेने मार्गस्थ झालो.<br />
<br />
माझी स्कुटी असल्याने...अनिकेत अन अभिजीत दोघांनाही अगदी निवांत बाइक चालावायला लागत होती.मला वाटत प्रथमतःच त्यांनी महामार्गावर एवढी निवांत बाइक चालवली असेल.आम्ही वाटेत असतानाच सुहासचा "आम्ही लोणावळ्यात नाश्ता करतो अहोत तुम्ही पण नाश्ता करुन घ्या" असा फ़ोन येउन गेला.रस्तामध्ये कुठे चांगले हॉटेल दिसल नाही त्यामुळे थेट कामशेतलाच नाश्ता करण्यासाठी थांबलो..कामशेतमध्ये मी पहिल्यांदाच अशी मिसळ खाल्ली की जी मध्ये मटकी व्यतिरिक्त मसुरची डाळ अन हरभरे होते.असो तिथे आमचा नाश्ता होईपर्यंत मुंबई वरुन येणार्यांपैकी महेंद्रकाकांची गाडी पोहचली होती.<br />
<br />
महेंद्र काका व सुरेश (अरे आपल ते देवेंद्र) या बझकरांना भेटण्याची ही पहिलीच वेळ...याअगोदर फ़क्त बझवरची ओळख...महेंद्र काका म्हणजे चांगलच वजनदार (भारदस्त) व्यक्तीमत्व आहे ;) मग सेनापतींची गाडी आली...सेनापतींना पण प्रथमच भेटलो...आता राहिलेल्या एका गाडीची वाट पाहत होतो...एकुणच आजचा ट्रेक चांगला धमाल होणार आहे याची जाणीव झाली होती.<br />
<br />
तिसरी गाडी मार्ग चुकली होती त्यामुळे त्यांना घ्यायला मी,अनिकेत व सासमु महामार्गावर जाउन थांबलो.तिसरा ग्रुप आल्यानंतर आम्ही तिकोन्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.पवनानगर पर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित पोहचलो...तिथे गेल्यावर सासमुला सुहासला फ़ोन करु रस्ता विचारयला सांगितल अन इथेच गडबड झाली...आता भरकटायची वेळ आमच्या दोघांची होती.पवनानगरच्या थोड पुढे आल्यावर डावीकडे वळुन मग सरळ यायच होत त्याऐवजी आम्ही एकदम सरळ निघालो...धरणापासुन खुप पुढे आलो तरी आम्हाला तिकोना येण्याच काही चिन्ह दिसेना..मला तर प्रत्येक डोंगर तर तिकोनाच आहे की काय असा भास व्हायचा...बराच वेळ झाल्यावर मग जाणवल की आपण रस्ता भरकटलो आहोत.तोपर्यंत सर्वजण तिकोन्याच्या पायथ्याशी पोहचले होते....संपुर्ण रस्त्यावर फ़क्त आम्हीच होतो त्यामुळे रस्ता विचारायचा तरी कोणाला?? थोड अंतर मागे फ़िरल्यावर एक मावशी भेटल्या मग त्यांनी व्यवथित मार्ग सांगितला...आम्हाला पवना ध्ररणाच्या सुरुवातीला परत जावा लागणार होत...शेवटी एकदाच आम्ही तिकोन्याच्या पायथ्याला पोहचलो तोपर्यंत ११.३० झाले होते.<br />
सर्वांची ओळख झाल्यावर रोहन ने सर्व सुचना दिल्या त्यानंतर गडाच्या दिशेने सर्व लोक निघाले.उन भरपुर होत त्यामुळे चांगलीच दमछाक होणार होती.आजुबाजुचे डोंगर हिरवाइने नटले होते....समोरच पवना धरणाचा जलाशय दिसत होता.एकंदरीतच सर्व वातावरण अगदी मस्त होत.फ़ोटोगिरी अन गप्पा टप्पा करत आम्ही सर्वजण गडावर पोहचलो.<br />
<br />
एवढ सगळ भटकुन झाल्यावर आता चांगली भुक लागली होती.आता जरा खादाडी सुरु असतानाचे फ़ोटो पहा.<br />
खादाडी झाल्यावर पुन्हा थोड भटकलो अन मग आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...जाताना अनुजा.देवेंद्र,सुहास यांना मी बकरा मिळालो होतो त्यामुळे चांगलाच टाइमपास झाला.(आता माझा बकरा का झाला व्हता हे म्या आज्याबात सांगणार नाय.)<br />
<br />
खाली पोहचलो तर अजुन समस्या आमची वाटच पाहत होती...माझ्या स्कुटीचं मागच चाक पंक्चर झाल होत.पवनानगर शिवाय पंक्चर काढुन मिळणार नव्हत त्यामुळे अंदाजे ५-६ कि.मी.कसरत करुन पोहचायला लागणार होत.पंक्चरच्या दुकानापर्यंचा प्रवास अगदी अविस्मरणीय असा होता.कामशेतला सर्वांसोबत चहा घेउन मग आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेला रवाना झालो.सुदैवाने तिथुन परतताना काही अडचण आली नाही.<br />
महेंद्र काका,श्रीताइ,आका,अनुजा, देवेंद्र,सेनापती,सासमु,सपा,सुझे,भामुं यांच्याशी फ़क्त आंजावरच बझ किंवा ब्लॉगच्या माध्यमातुन भेट व्हायची...पण शनिवारी या सर्वांना भेटुन खुप छान वाटल...यांच्यासोबत अजुनही नवीन मित्र मंडळी भेटली.<br />
<br />
या ट्रेक मध्ये बझवरील इतर कट्टेकरी हेरंब,विभि,आप,देवकाका,श्रेता,अपर्णा,तन्वी ताय,मीणल यासर्वांना खुप मिस केल.<br />
<br />
खरतर खादाडी काय काय केली याचा उल्लेख मी वर केला नाही...पण तो केला नाही तर तुम्हाला सर्वांना खुप वाईट वाटेल त्यामुळे खाली देत आहे.<br />
<br />
थेपले,भाकरी,बटाट्याची भाजी,चटणी,बाकरवडी,थालीपीठ,,सामोसे,अळुवडी,मोसंबी,सफ़रचंद,बेसनलाडु.<br />
<br />
अरे सर्वात महत्वाच म्हणजे अनुजाने आणलेल टांग....आता ही टांग काय आहे...हे जर मी असच सांगितल तर त्याच महत्व नाय कळणाय त्याच महत्व कळायच असेल तर त्यासाठी पुढ्च्या ट्रेकला याव लागणार.<br />
<br />
टीप:<br />
१. पोस्ट खुप घाइत खरडली आहे तवा चु.भु.दे.घे. <br />
२. ब्लॉगर बहुतेक गंडल आहे त्यामुळे फ़ोटु टाकता आले नाहीत. :(Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-24702818637346638772010-09-17T00:10:00.000+05:302010-09-17T00:10:00.434+05:30आठवणीतले खेळ -१रोज मी हाफ़िसातुन घरी येतो त्यावेळी आमच्या सोसायटीमधील बच्चे कंपनी खाली जमलेली असतात (अर्थात मम्मी पण सोबत असतेच) अन क्रिकेट खेळणे किंवा घोळका करुन कसल्या तरी गप्प ठोकत बसणे हेच चालु असत.मी जेव्हा त्या मुलांकडे पाहतो तेव्हा खर तर खुप वाईट वाटत....ते त्यांच बालपण हरवुन बसली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होती.त्यांचे खेळ,त्यांची मस्ती सार काही कोमेजुन गेलय.....त्यांनी अकाली प्रौढत्व आलय अस वाटत....बालपण कस अवखळ,अल्लड,दंगेखोर असल पाहिजे....योग्य त्या वयात योग्य तेच कराव... (आवरा...आवरा...बाबागिरी सुरु झाली...पोस्ट भरकटते आहे)<br />
<br />
त्यांच्याकडे पाहुन मला माझ बालपण आठवल...बालपणीच्या अश्याच काही हरवलेल्या खेळांविषयी खरडणार आहे....की ज्यांची उणीव मला नेहमीच भासते....लहानपणी प्रत्येक खेळाचा एक सिझन असायचा ...जसा मौसम बदलायचा त्याप्रमाणे खेळ पण बदलायचा.<br />
<br />
असाच एक प्रचंड आवडीचा खेळ : विट्टी दांडु.<br />
विट्टी-दांडु चा मौसम आला की तयारी चालु व्हायची ती म्हणजे तो तयार करण्यापासुन...आम्ही राहत असलेल्या वाड्यासमोरच लाकडाची वखार होती...तिथले औटी बाबा म्हणजे आमच हक्काच माणुस...फ़क्त त्यांना जाउन सांगायच ...आम्हाला विट्टी दांडु करायचा आहे लाकुड द्या...(म्हणजे अगदी तीर्थरुपांचीच वखार आहे असा अविर्भाव असायचा)...अर्थात हे सगळ चकटफ़ु असायचं...(विट्टी दांडुला लाकुड विकत घ्यायच म्हणजे ही त्या काळात अशक्य वाटणारी कल्पना होती)... त्यानंतर बाळु मिस्त्री होताच....त्याला एवढा त्रास देउन पण बिच्चारा आम्हाला असला भन्नाट विट्टी दांडु करुन द्यायचा की बस्स...तेव्हा तो जगातला सगळ्यात भारी माणुस वाटायचा...<br />
<br />
वि्ट्टी दांडु मधील कोली अन रिंगण-रिंगण हे दोन प्रकार आम्ही सर्वात जास्त खेळायचो...रिंगण-रिंगण मध्ये जर एखाद्यावर राज्य तंगला की तो कधी कधी दोन दोन दिवस चालायचा....शाळेत विट्टी दांडु घेउन जायच म्हणजे सर्वात मोठ दिव्य असायच ...जर चुकुन सरांच्या नजरेस पडल तर मग काही खैर नसायची वर घरापर्यंत बातमी पोहचायची...त्यामुळे शाळेच्या मैदानाजवळ (आमची शाळा गावाबाहेर असल्यामुळे मैदानाच्या आजुबाजुला सगळ माळरानच होत) असलेल्या झुरीत आम्ही लपवायचो...मग काय दुपारच्या सुट्टीत तेवढ एकच काम.<br />
<br />
कोली खेळताना भिडुने कोललेली विट्टी झेलताना खुपदा हाताच्या बोटांना जखम व्हायची...अन हाताची जखम घरी लपवायची म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट...ते लक्षात आल की घरात मग काय आमच्या नावाने सत्यनारायणच व्हायचा. . . . मग यापासुन वाचण्यासाठी आम्ही गांधी टोपीचा वापर करायला लागलो (पांढरा शर्ट, अर्धी खाकी चड्डी अन गांधी टोपी हा आमचा गणवेष होता)....गांधी टोपीचा आजतागायत तरी कोणी असा वापर केला नसेल . :)<br />
<br />
असा हा विट्टी दांडु फ़ीवर विट्टी -दांडु पाणी तापवायच्या बंबात गेल्याशिवाय उतरायचा नाही.....म्हणायला तो पर्यंत आमच मनोसक्त खेळुन झालेल असायचं त्यानंतर मौसम असायचा "गोट्यांचा".<br />
<br />
विट्टी दांडु हा खेळ आता जवळपास नामशेष झाला आहे...शहरात सोडा गावाकडे पण आता कोणी हा खेळ खेळताना दिसत नाही...हा खेळ सध्या तरी इतिहास जमा झाल्यासारखाच आहे.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com27tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-73512374875951534242010-09-15T23:03:00.001+05:302010-09-15T23:06:29.889+05:30सौजन्याच्या आयला ......आजच्या युगात जर तुम्ही जास्त सौजन्य दाखवुन जर तुम्ही कोणाची कीव केली तर तुमचा जीव घेतील.असाच अनुभव मी दोन दिवसांपुर्वी घेतला.<br />
<br />
घरी टी.वी. नसल्यामुळे तो खरेदी करायचा असा निर्णय झाला.कोण म्हणायच LED घे तर कोणी म्हणायच LCD घे.प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला.....शेवटी सर्वात म्ह्त्वाचा म्हणजे खिश्याचा सल्ला घेतला अन बजेट नुसार LCDच घेउ या असा निर्णय झाला.आता LCD कोणत्या कंपनीचा, किती इंची घ्यावा यावर काथ्याकुट सुरु झाला...(किती चिकित्सक...किती अभ्यास करतोय...किती शहाणं ते लेकरु...शाब्ब्बास)....कोणत्याही कंपनी शो रुमला जाण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मॉलला जाऊन घेउ या म्हणजे सर्व ब्रॅंड पाहता येतील ह्या हेतुने सातारा रोडवरील "विजय सेल्सला" गेलो.<br />
<br />
तिथे प्रवेश करताच अगदी हसतमुखाने स्वागत झाले...(नवीन बकरा आला आहे...चला कापु या...असाच काहीसा अविर्भाव सेल्समनच्या चेहर्यावर होता...त्याबरोबरच काउंटवरील कन्या "आता ह्याच काही खर नाही सेल्समन याला बरोबर घेणार" या विचाराने गालातल्या गालात खदाखदा (गालातल्या गालात खदाखदा कस??? जेव्हा खरेदी जाल ना तेव्हा समजेल हे) हसत होती)प्रत्येक मॉडेलला तो चांगलच म्हणुन साधारण आमचा अंदाज घेत होता..म्हणजे हे फ़क्त वेळ घालवायला आले आहेत की खरोखर टी.वी. घ्यायचा आहे याची चाचपणी चालु होती.<br />
<br />
त्यातच त्याने ललॉईड नावाचा एक भारतीय बनावटीचा LCD दाखवला...थोडे त्याचे गुणगान गाउन हाच टी.वी. सध्या किती उत्तम आहे हे पटवत होता...(च्यायला मेरे कु येडा समझ रहा था...उस कु क्या पता मैं भी बारा पिंपळ का मुंज्या है..)मग त्याला चांगलाच घेतला...हो सर थोडी पिक्चर क्वालीटी कमी...साउंड पण बरा आहे...उसबी चालत नाही..HD इनबिल्ट नाही...अरे मग आहे काय यात??<br />
<br />
त्यांनतर सॅमसॅंग अन एल.जी.चे मॉडेल पाहयला सुरुवात केली...थोड्यावेळापुर्वी भारतीय बनावटीच्या LCDचे गुणगान गाणारा आता हेच LCD बेश्ट आहे हे पटवत होता...त्याची इतकी वटवट (आपला सत्यवान नव्हे) चालु होती...(आयला हा झोपेत पण हेच बरळत असणार)...मी आपला मनोभावे श्रवणभक्ती करत होतो...एवढ सार पाहुन म्हणजे ऐकुन मला मनासारखा LCD मिळत नव्हता. जीजुंना मात्र सॅमसंगचा आवडला होता..<br />
<br />
तुमच्या कडे सोनी चे टी.वी. नाही आहेत काय??? म्या पामराने त्याला प्रश्न केला....माझ्याकडे पाहुन आहे की पण त्यांच्या किंमती फ़िक्स आहेत तिथे कमी जास्त होणार नाही (हे अगदी हलक्या आवाजात)...चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दाखवा मला सोनी चे टी.वी....(अरे पावट्या कुठे बार्गेन करायच हे मला माहित आहे...ते तु नको शिकवु..हे मनात) अस म्हणुन आता सोनीच्या मॉडेल्सवर काथ्याकुट चालु केला...आता सेल्समन नी सोनीचे गुणगान सुरु केल...जिकडं खोबर तिकडं चांगभल...या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला....शेवटी सोनीच एक मॉडेल आवडल मग जास्त विचार न करता तेच अंतिम करुन टाकलं.<br />
<br />
पेमेंटसाठी ५०% आता अन ५०% टक्के उद्या देतो अन टी.वी. आजच घेऊन जातो असा पर्याय मी ठेवला..हा ते मान्य नाही करणार हे माहित होत पण तरीही उगाचच आपला शहाणपणा करत होतो...इतका वेळ आमच्या मागे पुढे फ़िरणारा आमची सर्विस किती चांगली आहे...तुम्ही इथेच खरेदी करा यासाठी पटवणारा सेल्समन निर्णय अंतिम झाल्यावर गायब झाला होता....त्यानी त्याच काम साधल होतं.<br />
<br />
आम्ही पेमेंट करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत टी.वी.घरपोच मिळेल अस आश्वासन घेउन (सामान्य माणसाच्या पदरात नेहमी हेच मिळतं) आनंदातच घरी पोहचलो...घड्याळाचा काटा जसा पुढे जात होता तशी उत्सुकता वाढत होती...पाच वाजले तरी न त्यांचा काही फ़ोन आला नव्हता...त्यांनी दिलेल्या नंबरवरही कोणी फ़ोन घेत नव्हत...शेवटी खुप वेळाने फ़ोन घेतला...इकडे-तिकडे अस चार पाच ठिकाणी ट्रान्सफ़र होऊन शेवटी योग्य विभागात फ़ोन पोहचला. अर्ध्या तासात टी.वी. पोहचेल अस सांगुन मी काही बोलायच्या आत पलीकडुन फ़ोन आपटला गेला.<br />
<br />
शेवटी एकदाचा सात वाजता विजय सेल्सचा माणुस टी.वी.घेउन पोहचला...बॉक्स पाहण्याअगोदर अगदी घाईत ओपन केला...फ़िटींग वगैरे सुरु केली...तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची शंका आली...म्हणुन पीस पाहिला तर तो पुर्णतः धुळीने माखला होता...बाजुची पॅकींगची टेप निघालेली होती...नीट पाहिल्यावर कळल त्यांनी शो रुमचा लुज पीस नवा पीस म्हणुन पाठवला होता...च्यायला मुर्ख समजतात की काय?? डिलीवरी घेउन आलेल्या तो पीस न घेताच त्याला तिथुन पिटाळल अन मी शो रुमला निघालो...सकाळी हसुन स्वागत करणार्या सेल्समन आता मात्र त्रासिक मुद्रेने.... काय झाल??? डिलीवरी मिळाली ना??? मी शक्य तितक्या सबुरीने त्याला सगळ रामायण सांगितल....ते ऐकुन त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावुन आम्हाला त्याच्याकडे स्वाधीन करुन कल्टी मारली...मी आपला तेवढ्याच कळकळीने झालेला प्रकार सांगितला...तर यावर अस होण शक्य नाही आम्ही नवीनच पीस दिला आहे...इ..इ..सुरु केल...शेवटी वाद नको म्हणुन मी आपली माघार घेतली अन त्याला म्हणल मला हा पीस नको दुसरा द्या...तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर तो परत आला....आज दुसरा पीस देण काही शक्य नाही...उद्या नक्की देतो..चला एका रात्रीने काय फ़रक पडणार आहे असा विचार करुन मी तिथुन निघालो.<br />
<br />
आता दिवस दुसरा....दुपार पर्यंत विजय सेल्स कडुन काहीच संपर्क झाला नाही...म्हणुन मग मीच त्या मॅनेजरला फ़ोन केला...एका तासात डिलीवरी नक्की मिळेल..काळजी नका करु...पाठवतो म्हणजे पाठवतो... टिपीकल बोलबच्चन टाकला...मी आपला बर बाबा ठीक आहे...दुसर काय करणार... अडला हरी गाढवाचे पाय धरी...एका तासाचे दोन तासात झाले तरी घरी डिलीवरी पोहचली नव्हती...या दरम्यान त्याला खुपदा फ़ोन केला पण त्याने काही अटेंड केला नाही....त्यात हाफ़िसात नेमका मेजर प्रॉब्लेम आला...मग अजुनच चिड चिड होत होती....अखेरीस सहाच्या दरम्यान त्यानेच फ़ोन केला....तुमची डिलीवरी पाठवत आहे...नवीन पीस आहे...व्यवस्थित पाहुन घ्या...मी हाफ़िसात अडकलो होतो त्यामुळे ठीक आहे अस जुजबी उत्तर देउन फ़ोन बंद केला..घरी फ़ोन करुन मावसभावाला टी.वी. व्यवस्थित पाहुन घे अस बजावुन मी आपला कामाला जुंपलो....हाफ़िसातलं काम संपवुन घरी निघालो तोच भावाचा फ़ोन आला आज पण कालचा पीस परत पाठवला आहे.... हे ऐकल्यावर मात्र संयम संपला त्याला तो पीस परत कर घेउ नकोस अस सांगुन मी थेट विजय सेल्स गाठल...ह्यांच्याशी आता सौजन्य सोडुनच बोलाव लागणार होत...मनातल्या मनात सगळ्या शिव्यांची रिवीजन केली..<br />
<br />
दुकानात घुसल्याबरोबर मॅनेजरला गाठल....अन जे सुरु झालो की बस्स....क्षणात सगळ स्टोअर माझ्या बाजुने गोळा झाल होतं (राउंड टेबल झाल होत...मध्ये फ़क्त मी अन तो मॅनेजर होतो)...मी हाफ़िसाचा सगळा वैताग त्याच्यावर काढत होतो...हे किडमड काय बोलु शकतो??....एकदम पप्पु आहे...असा त्याचा समज होता...पण जेव्हा त्याने माझा तो रुद्रावतार पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...सोबत आलेला मित्र मला थांबवत होता...तो काय म्हणतोय ते तर ऐकुन घे....पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो....मी आपला सुरुच होतो...शेवटी मित्राने मला बाजुला घेतल म्हणाला अरे थोडा शांत हो...तो काय म्हणतोय ते तरी बघु....मी केलेल्या राड्याचा योग्य तो परीणाम साधला गेला होता...आता सगळे सुतासारखे सरळ झाले होते...झालेली चुक मान्य करुन उद्याचा दिवस द्या ...उद्या तुम्हाला नवीन पॅक पीस देतो..तो नाही आवडला तर रिफ़ंड देईल या अटीवर मी तिथुन निघालो....जाम डोक दुखत होत....बाहेर पडल्याबरोबर जवळच्याच अमृततुल्य मध्ये चहा मारला.<br />
<br />
तिसर्या दिवशी मी आज पुन्हा राडा करायचा अन पैसे परत घ्यायचे याची पुर्ण तयारी केली होती....संध्याकाळी हाफ़िसातुन थेट स्टॊअरवर पोहचलो....आज स्वागत मात्र अगदी सौजन्याने झाल...स्टोअर मधील सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या....अरे हा तो कालचाच रे...आता आज हा काय करतोय याकडेच लक्ष होत.....मॅनेजरने मला आलेला नवीन पीस दाखवला...आज मात्र अगदी नवीन अन व्यवस्थीत पीस होता....तो पाहिल्यानंतर मग खुष झालो.<br />
<br />
पुन्हा व्यवस्थित पॅक करुन स्वतःच डिलीवरी घेउन आलो....तिथुन निघल्यावर तो मॅनेजर मला बाहेर पर्यंत सोडवायला आला...परत काही खरेदी करायच असेल तर अगदी निश्चिंत या...मी म्हणल "घंटा" (मनात)<br />
<br />
यातुन एक धडा घेतला जास्त सौजन्य दाखवल तर हे गेंडा कातडी लोक तुम्हाला दाद देणार नाही....अरे ला कारे केल की आपोआप वठणीवर येतात....कदाचित त्यांना खळ्ळ-फ़ट्याक ची भाषा अवगत असल्यामुळे सौजन्याचं अपचन होत असेल.Yogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com27