असा "आदर्श" घेतील का???

लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही  कार  सरकारने देउ केली होती.

त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या  दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.

हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???

आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.

"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.

हे बदलेल का कधी???

शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???

सारथ्य "माणुसकीचे"

हजारो कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगपतीच्या ड्रायव्हरचे निधन झाल्यानंतर त्या उद्योगपतीची प्रतिक्रिया काय असेल....त्याला दुःख होईलच,पण आपल्या हातातील कामकाज सोडुन त्याच्या अंत्यविधीसाठी पुण्याकडे हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेणारा आणि ड्रायव्हरने तीस वर्षे सेवा केली म्हणून त्याच्या शेवटच्या प्रवासाचे ड्रायव्हिंग आपण स्वतः करणारा उद्योगपती नुकताच पुणेकरांनी पाहिला.

आजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.

पुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन व्हावी ही पुनवाला यांची इच्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.

ज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.

यावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... "पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते."

काल ही बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे तिकडे स्वार्थ,भ्रष्टाचार,गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे...