पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....


स्वरभास्कर भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....

स्वर पंढरी आज पोरकी झाली.... :( :(




पंडीतजींचा फ़ोटो जालावरुन साभार.

मोदींचा गुजरात...

साधारण एक तीन वर्षापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त अहमदाबादला राहण्याचा योग आला होता.तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रसारमाध्यमातुन दोन प्रकारच्या प्रतिमा रंगवल्या जात होत्या काहींना ते "मसीहा" वाटत होते तर काहींना ते "खलनायक" वाटत होते.त्यामुळे नरेंद्र मोदी ह्या रसायनाविषयी मनात कमालीची उत्सुकता होती.अहमदाबादला विमानतळावर उतरलो तेव्हा हॉटेलवर घेउन जाणार्‍या चालकाला सहज मोदींविषयी विचारलं....

"अरे भैय्या, आपके ए नरेंद्र मोदीजी कैसे इन्सान है?? आपको क्या लगता है??"

यावर त्याच उत्तर होत..

"साब, थोडे दिन में गुजरात के घर घर में मोदीजी तस्बीर होगी.बडा सच्चा इन्सान है।"

एका सामान्य माणसाच्या नजरेतुन ही मोदींची प्रतिमा होती. नुकतच "वायब्रंट गुजरात" झाल त्यातुन गुजरात मध्ये येणारे उद्योजक सर्व उद्योजकांनी मोदींबद्दल काढ्लेले गौरवोद्गार....हे सगळ पाहिल्यावर मला त्या चालकाची आठवण आली त्यावेळी त्याने काढलेले उद्गार नक्कीच खरे झाले आहेत.अभिमान वाटावा अशीच कामिगिरी नरेंद्र मोदींनी करुन दाखवली आहे.तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काय करु शकता हेच मोदींनी दाखवुन दिल आहे.

विरोधक आज मोदींच्या नावाने कितीही कंठशोष करीत असले तरी सत्य परिस्थिती लपुन राहत नाही.आज मोदींवर सामान्य नागरिकापासुन ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पर्यंत प्रत्येकाचाच मोदींवर विश्वास आहे.याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदींच्या फ़क्त एका एस.एम.एस.वर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला.

हा विश्वास एका रात्रीतुन आलेला नाही त्यामागे मोदींची विकासाची दुरदृष्टी, त्यांनी घेतलेले कष्ट. त्यांचे विकासासाठी केलेले नियोजन,कुशल नेतृत्व हे सार काही आहे.राज्यामधील मुलभुत गरजांवर केलेला विकास.

मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यांनी "ज्योतीग्राम" योजनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्य भारनियमन मुक्त केल.गुजरातमधील वीजचोरी रोखली.सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहचले त्यांचे मुद्दे पटवुन दिले अन महत्वाच म्हणजे सर्वांना ते पटल त्याचचं फ़ळ त्यांना मतपेटीतुन मिळाल.

त्यानंतर सरदार सरोवराच्या माध्यमातुन पाण्याचा प्रश्न सोडवला. सरदार सरोवराच्या विरोधात असणार्‍या पर्यावरणवाद्यांना ते पुरुन उरले.नर्मदेच्या पाण्याचा अगदी योग्य पद्धतीने नियोजन अन उपयोग करुन पाण्याचा प्रश्न सोडवला.

दळणवळणाचा प्रश्न हाती घेतला.गुजरात मधील रस्ते जर पाहिले तर एकदम चकाचक.अगदी खेड्यातील रस्ते सुद्धा व्यवस्थित आहेत.थोडक्यात काय तर मोदींनी ज्या मुलभुत गरजा आहेत म्हणजे रस्ते,वीज अन पाणी यावर अगदी नियोजनबध्द काम केल. पण हे सार करताना सर्व कामगार अगदी पारदर्शक कुठे सुद्धा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही.

उद्योजकांना फ़क्त सुविधाच नाही तर पारदर्शक कारभाराचा विश्वास पण दिला त्यामुळेच कोणतही काम किंवा योजना लालफ़ितीच्या कारभारात अडकत नाही.संपुर्ण शासकीय यंत्रणेवर मोदींचा वचक आहे.त्यामुळे सर्व काम कशी फ़टाफ़ट होतात.

आजमितीला नरेंद्र मोदी खरोखर "विकासपुरुष" झाले आहेत.

हे सगळ पाहताना माझ मन नकळत महाराष्ट्रात काय चालु आहे याचाच विचार करत होत.गुजरात ज्या वेगाने पुढे जात आहे त्याच वेगाने आपली अधोगती चालु आहे.भ्रष्टाचार,जाती-पातीच राजकराण,भाषावाद,बाबुगिरी यासगळ्यात महाराष्ट्र भरडला जात आहे.जे मोदींना गुजरात मध्ये शक्य आहे ते महाराष्ट्र मध्ये एकाही नेत्याला किंवा पक्षाला शक्य नाही.स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यात मश्गुल असणारे नेते ह्या स्वराज्यात निपजले आहेत हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे.

काही दिवसांपुर्वीचा एक घटना आठवते आहे....जेव्हा आदर्श अन इतर गोष्टींवरुन महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा चालु होता तेव्हा मोदी मुंबई मध्ये गुजरातसाठी एक रोड शो करुन गेले होते.त्याची साधी दखल सुद्धा आपल्या नेत्यांनी घेतली नव्हती.तेव्हा महाराष्ट्रात चालु असणार्‍या घडामोडींबद्दल एकही टिप्पण्णी केली नाही...ते आले...त्यांनी पाहिल...अन ते जिंकले.यातुनच ते किती धुरधंर राजकारणी आहेत हे दिसुन येत.

महाराष्ट्रालाही असाच एक नरेंद्र मोदी लाभो हीच सदिच्छा.

जाता..जाता...खाली दोन दुवे देत आहे ते जरुर पाहा...पहिला आहे गुजरात राज्य सरकारचा अन दुसरी महाराष्ट्र सरकारचा...मग मी जे वर म्हणलोय ते नक्की पटेल.

गुजरात राज्य सरकार :
http://www.gujaratindia.com/index.htm

महाराष्ट्र राज्य सरकार:
http://maharashtra.gov.in/

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

सर्व ब्लॉगर्स मित्र, वाचक अन त्यांच्या परीवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.






शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार.

पहिल बक्षीस..

दोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.



या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...

"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र."

हे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.

यानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का??? २५ पैसे.



अन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.

मला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.

त्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्‍याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्‍याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.

आजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)

????

लेखाच शीर्षक पाहुन तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल ना....पण हा मला पडलेला प्रश्न आहे. (यात काय नवीन ते तर नेहमीचचं आहे)

आज संध्याकाळी "सकाळ" (हो सकाळ संध्याकाळीच वाचतो) वाचायला घेतला तर "राजीव गांधीं राष्ट्रीय पारितोषिक" याची मोठी जाहिरात दिसली.मग सहज विचार केला आपल्या देशात सरकारची कोणती पण योजना ही फ़क्त राजीव गांधी,इंदिरा गांधी अन पंडीत नेहरु या तीन नावांभोवतीच का घुटमळते???

जरा हे पहा...
१.राजीव गांधी राष्ट्रीय पारितोषिक योजना
२.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
३.राजीव गांधी उद्योग मित्र योजना (लघु उद्योजकांसा्ठी)
४.राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
५.राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
६.RAJIV GANDHI NATIONAL CRÈCHE SCHEME FOR THE CHILDREN OF WORKING MOTHERS
७.Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls
८.इंदीरा आवास योजना
९.इंदीरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना
९.जवाहरलाल नेहरु रोजगार योजना
१०. जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजना

ह्या उदाहरणादाखल दिलेल्या काही योजना आहेत.या योजनांमध्ये करोडो रुपये ओतले जातात ते पण तुम्ही आम्ही भरणार्‍या करातुनच.याचा खर्‍या गरजुंना किती लाभ होतो याबद्द्ल शंकाच आहे.असो तो वेगळाच मुद्दा आहे त्यावर वेगळीच पोस्ट होऊ शकते.


तर मी काय म्हणत होतो ...राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार जेव्हा कधी योजना जाहीर करतात ती या तीन नावांच्या पलीकडे कधीच जात नाही.भगतसिंग,राजगुरु किंवा लालबहाद्दुर शास्त्री यांच्या नावाने कधी कोणती योजना ऐकली आहे का हो??(माझ्या तरी ऐकण्यात नाही एखादी असेल तर जरुर सांगा)

ह्या तीन व्यक्ती सोडल्या तर भारतात अशी एक पण लायक व्यक्ती झालीच नाही का??

सरकारी योजना तर सोडाच रस्ते, उड्डाणपुल,सरकारी दवाखाने, विमानतळ,जलाशय,संग्राहलये, उद्याने काही असो यांची नाव असलीच पाहिजे.सगळीकडे यांच्याच नावाचा उदो उदो करुन सरकारला नक्की साधायच तरी काय आहे??

 आज भारतातल्या खेडोपाडी मुलभुत सुविधा पोहचल्या नाहीत पण ह्या तीन नावांच्या रुपाने कोणती ना कोणती योजना मात्र नक्कीच पोहचली आहे.यामागच राजकारण न समजण्या इतपत  भारतीय मुर्ख आहेत का???



फ़क्त योजना जाहिर करुन मुलभुत गरजा अन विकास साधता नाही.खरोखर विकास साधायचा असेल तर तो वातानुकुलीत खोलीत चर्चा झोडुन साधता येत नाही त्यासाठी खेडॊपाड्यात पोहचुन काम करण्याची गरज आहे हे ज्या दिवशी राजकारण्यांना कळेल तेव्हाच याच उत्तर मिळेल.

विरोध हा नाव देण्याला नाही तर त्याच्या मागुन केल्या जाणार्‍या राजकारणाला आहे.





संदीपची कविता....

संदीप खरे.....बस्स नाम ही काफ़ी है...

तशी संदीपची प्रत्येक कविता आवडते पण ही एक मला प्रचंड आवडणारी कविता.

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-संदीप खरे.