एक स्वप्न घेऊन ५० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आला होता....या पन्नास वर्षात महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अश्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटावलाय....या सोबत मनाला सल लावतील अश्या घटना शिवारायांच्या स्वराज्यात घडल्यात... आजही आमचा शेतकरी वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासुन वंचित आहे. खून. दरोडे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे राजरोस घडत आहे..... माफिया राज वाढत आहे....दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्या महाराजांच्या स्वराज्यात आता जोडे उचलण्याची परंपरा आली आहे. . . तरीही आम्ही आशावादी आहोत...हे सार बदलेल नव्हे आपण हे बदलण्याचा प्रयत्न करू या....पुढील पन्नास वर्षात नक्कीच महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!!
वॉलपेपर
अच्युत पालव यांच्या साईट वरुन साभार!!!!