Showing posts with label भारत. Show all posts
Showing posts with label भारत. Show all posts

आणि बुद्ध हसला....

तब्बल २८ वर्ष ह्या क्षणाचा करोडो लोक वाट पाहत होते...अखेरीस तो आज पुर्णत्वाला गेला.

आपला सचिन गेली दोन दशक ज्याने विक्रमांचे डोंगर रचले.ज्याच्या झोळीत आज पर्यंत असंख्य विक्रम आहेत तरी पण एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे "विश्वचषक". जस एखाद्या पांढ्र्‍या शुभ्र कागदावर एक लहानसा काळा डाग असावा अन त्या डागाच अस्तित्व संपुर्ण पांढर्‍या शुभ्र कागदला झाकोळुन टाकत.तसच काहीस सचिनच्या बाबतीत झाल होत.गेली दोन दशक त्या डागाच ओझ मनावर होत...सचिनच्या अन प्रत्येक सचिनच्या चाहत्यावर.आज अखेरीस ते दडपण दुर झाल.





कालच्या सामन्यात सचिन खेळला नाही याच नक्कीच दुःख आहे पण दुसर्‍या बाजुने विचार केल्यावर वाटत एका दृष्टीने बर झाल आजपर्यंत ज्याने आपल्या खेळाने प्रत्येकाला भरभरुन दिल.अनेक कठीण प्रसंगी देशाचा तारणहार झाला.त्याला जर याचा परतावा द्यायचा असेल तर काल आपल्या टीम ईंडीया ने ज्या रितीने परतावा केला याहुन अमुल्य असा परतावा होऊच शकत नाही. गेली दोन दशक ज्या हातांना फक्त दान देणं एवढच ठाउक होत त्या हातांनी काल प्रथमच काही घेतल आहे.

मायभुमीमध्ये मिडीया, रवी शास्त्री सारखे विघ्नसंतोषी लोक व चाहत्यांच्या अपेक्षांच ओझ अशा प्रचंड दडपणात टीम इंडीया ने जो खेळ केला आहे त्याला मनापासुन सलाम करावासा वाटतो आहे.

चक  दे इंडीया......

टीम इंडीया तुमचे खुप खुप आभार....आयुष्यातील खुप अविस्मरणीय अशे क्षण दिले आहेत....कोणी काही बोलो आम्हाला तुमचा अभिमान आहे.

असा "आदर्श" घेतील का???

लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही  कार  सरकारने देउ केली होती.

त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या  दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.

हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???

आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.

"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.

हे बदलेल का कधी???

शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???

????

लेखाच शीर्षक पाहुन तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल ना....पण हा मला पडलेला प्रश्न आहे. (यात काय नवीन ते तर नेहमीचचं आहे)

आज संध्याकाळी "सकाळ" (हो सकाळ संध्याकाळीच वाचतो) वाचायला घेतला तर "राजीव गांधीं राष्ट्रीय पारितोषिक" याची मोठी जाहिरात दिसली.मग सहज विचार केला आपल्या देशात सरकारची कोणती पण योजना ही फ़क्त राजीव गांधी,इंदिरा गांधी अन पंडीत नेहरु या तीन नावांभोवतीच का घुटमळते???

जरा हे पहा...
१.राजीव गांधी राष्ट्रीय पारितोषिक योजना
२.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
३.राजीव गांधी उद्योग मित्र योजना (लघु उद्योजकांसा्ठी)
४.राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
५.राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
६.RAJIV GANDHI NATIONAL CRÈCHE SCHEME FOR THE CHILDREN OF WORKING MOTHERS
७.Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls
८.इंदीरा आवास योजना
९.इंदीरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना
९.जवाहरलाल नेहरु रोजगार योजना
१०. जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजना

ह्या उदाहरणादाखल दिलेल्या काही योजना आहेत.या योजनांमध्ये करोडो रुपये ओतले जातात ते पण तुम्ही आम्ही भरणार्‍या करातुनच.याचा खर्‍या गरजुंना किती लाभ होतो याबद्द्ल शंकाच आहे.असो तो वेगळाच मुद्दा आहे त्यावर वेगळीच पोस्ट होऊ शकते.


तर मी काय म्हणत होतो ...राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार जेव्हा कधी योजना जाहीर करतात ती या तीन नावांच्या पलीकडे कधीच जात नाही.भगतसिंग,राजगुरु किंवा लालबहाद्दुर शास्त्री यांच्या नावाने कधी कोणती योजना ऐकली आहे का हो??(माझ्या तरी ऐकण्यात नाही एखादी असेल तर जरुर सांगा)

ह्या तीन व्यक्ती सोडल्या तर भारतात अशी एक पण लायक व्यक्ती झालीच नाही का??

सरकारी योजना तर सोडाच रस्ते, उड्डाणपुल,सरकारी दवाखाने, विमानतळ,जलाशय,संग्राहलये, उद्याने काही असो यांची नाव असलीच पाहिजे.सगळीकडे यांच्याच नावाचा उदो उदो करुन सरकारला नक्की साधायच तरी काय आहे??

 आज भारतातल्या खेडोपाडी मुलभुत सुविधा पोहचल्या नाहीत पण ह्या तीन नावांच्या रुपाने कोणती ना कोणती योजना मात्र नक्कीच पोहचली आहे.यामागच राजकारण न समजण्या इतपत  भारतीय मुर्ख आहेत का???



फ़क्त योजना जाहिर करुन मुलभुत गरजा अन विकास साधता नाही.खरोखर विकास साधायचा असेल तर तो वातानुकुलीत खोलीत चर्चा झोडुन साधता येत नाही त्यासाठी खेडॊपाड्यात पोहचुन काम करण्याची गरज आहे हे ज्या दिवशी राजकारण्यांना कळेल तेव्हाच याच उत्तर मिळेल.

विरोध हा नाव देण्याला नाही तर त्याच्या मागुन केल्या जाणार्‍या राजकारणाला आहे.