व्यक्ती आणि वल्ली...

आपल्या सभोवताली अशे खूप सारे नमुने (म्हणजे अशी लोक की त्यांच्या बोलण्याच्या लकबी किंवा काही तरी विचित्र वागायच) असतात की जे नकळत आपल्याला (म्हणजे आमच्या सारख्याना जे अश्या नमुन्यांच्या शोधात असतात) हसण्यासाठी भरपूर वातावरण निर्मिती करून देतात. अश्याच एका वल्ली विषयी आज लिहतोय. ते दुसरं कोणी नसून आमचे एक प्राध्यापक आहेत. (त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून लिहतोय).... पण कोणताही गैरसमज नको. फक्त विनोदी अंगाने पहा.

आमचे हे सर जेव्हा इंग्लिश बोलायचे तेव्हा आमचा अगदी मानसिक छळ असायचा.यांनी तृतीय वर्षात Fluid Mechanics तर शेवटच्या वर्षात Prestress Concrete Design शिकवला होता.

आम्ही तृतीय वर्षाला गेल्यानंतर पहिल्याच तासाला त्यांनी त्यांच्या विषयी सांगताना एक वाक्य वापरल अन् आम्ही फक्त बाकावर डोक आपटायच राहिलो होतो. ते म्हणाले होते...

I have two daughters both are girls.

या नंतर आमचा खूप स्नेह (स्नेह कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल) वाढत गेला व आम्हाला अशेच भरपूर किस्से मिळत गेले. थोड्या दिवसात आम्हाला समजल की जर आपल सबमीशन अगदी विनासायास करायच असेल तर सरांसोबत फक्त इंग्रजीतून बोलायच. आपण इंग्रजीत बोलायला लागलो की आपोआप फाईल वर सही व्हायची.

या सरांमुळे आमच Probablity खूप चांगल झाल होत. यांना प्रत्येक दोन वाक्यांमध्ये You See  म्हणायची सवय होती. वाक्याची सुरूवात अन् अंत दोन्ही पण You See ने व्हायचा. मग काय संपुर्ण तासात आम्ही फक्त तेच मोजायचो.... किती वेळा म्हणतात ते.

यांच अजुन एक प्रसिद्ध वाक्य.....

Please close the Doors of Window.

शेवटच्या वर्षाला आम्हाला Prestress Concrete  विषय शिकवला होता...त्यात हे स्ट्रेस, स्ट्रेन, स्ट्रेट टेंडन अशे सगळे शब्द.

हे सर स्ट्रेस ला ट्रेस ....स्ट्रेन ला ट्रेन....स्ट्रेट ला ट्रेट...म्हणायचे...पहिल्या तासाला आम्हाला हे समजे पर्यंत आमच्या शिट्ट्या वाजल्या होत्या.

आम्हाला एकदा हे सर साईट विजीटला घेऊन गेले तिथे यांना आम्हाला बीम अन् कॉलम जॉइंट एक्सप्लेन करायच होत...यांनी कस सांगाव....

You See, This Bar Comes from there (उजवीकडे हात करून).... This Bars Comes from there (डावीकडे हात करून)  and You See all they are meet together here.

एकदा तास चालू असताना मी मस्ती करताना चुकुन पकडला गेलो तर यांनी मला अस सुनावल...

If you want to seat then seat, If you dont want seat then dont seat.

आता तुम्हाला अंदाज आलाच असेल यांचा तास म्हणजे आम्हाला किती मोठी पर्वणी होती. असो अशे खूप सारे किस्से आहेत यातले निवडक तेवढे सांगितले आहेत.

गूढ मृत्यू...

आज सकाळी स्टार न्युज वर संजय गांधीच्या मृत्यू वरचा "वो १२ मिनीट" हा रिपोर्ट पाहिला. आज पर्यंत त्यांच्या मृत्यू बद्दल खूप सार्‍या कथा आहेत पण सत्य मात्र काय आहे याबाबत कोणा कडेच ठोस असा पुरावा नाही. प्रत्येक जन आप आपल्या सोयी नुसार सांगत असतो. एकदा हाफिसात असाच या विषयावर काथ्या कूट चालू होता तेव्हा एका मित्राच्या म्हणण्या नुसार हा अपघात इंदिरा गांधीनी स्वतः घडवून आणला होता. त्याला याबाबत विस्तृत स्पष्टीकरण मागीतल तेव्हा मात्र त्याचा पोपट झाला.(च्यामारी उचलली जीभ लावली टाळ्याला)त्याच्या म्हणण्यानुसार संजय गांधी हे डोईजड झाले होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. मला मात्र तो निव्वळ फालतुपणा वाटला. कोणतीच आई अस वागू शकत नाही.

असाच एक लेख महाजालावर वाचण्यात आला....तो इथे वाचू शकता

याच प्रमाणे अशे खूप सारे गूढ मृत्यू आहेत की ज्यांची आज पर्यंत उकल झालीच नाही. असाच एक प्रसिद्ध गूढ मृत्यू असणारी व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या मृत्यू बद्दल कथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. सरकारने पण नेहमीप्रमाणे समित्या स्थापन करून याची उकल करण्याचा प्रयत्न केला.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ (शाह नवाझ समिती)  मध्ये एका आयोगाची नियुक्ती केली. त्या वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजी त्या विमान अपघातातच मृत झाले होते. परंतु ज्या तैवानच्या भूमिवर हा अपघात झाल्याची खबर होती, त्या तैवान देशाच्या सरकारशी तर ह्या  आयोगांनी संपर्कच साधला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे म्हटले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद येथील मृत्यू हे सुद्धा असच एक एक गूढ आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू होता की हत्या याबाबत ही वेगवेगळे मत प्रवाह आहेत पण सत्य काही माहीत नाही.

तशी गूढ म्रुत्युंची परंपरा ही अगदी इतिहासापासून आहे. अश्वत्थामा (हा अजुन जिवंत आहे अन् त्याला पाहण्यात आलाय अस काही लोकांचा दावा आहे) असो किंवा संत तुकाराम महाराज असो किंवा शिवाजी महाराज प्रत्येक मृत्यू मागे एक गूढ अन् त्यामागे प्रत्येकाची स्वतःची अशी एक कथा पण सत्य काय ते आजतागायत कधीच समजू शकल नाही किंवा यावर समाधानकारक संशोधन पण दिसत नाही...(हे माझ वैयक्तिक मत आहे)

आता नजीकच्या काळात पण असेच गूढ मृत्यू झाले जसे की डायना, मायकेल जॅक्सन, परवीन बॉबी, दिव्या भारती त्याविषयी पण फक्त  नवीन कथाच आल्या पण सत्य नाही.

अस म्हणतात की सत्य कधी लपून राहत नाही मग इतक्या वर्षा नंतरही हे सगळे मृत्यू गूढ बनून का आहेत?? यातील सत्य कधी बाहेर येईल की नाही कोणीच सांगु शकत नाही.