चप्पलवटा - गोष्ट एका वाल्याची!!

ही कहाणी आहे कलीयुगातील वाल्याची. अध्यात्माची कास धरली तर जीवनात किती बदल घडू शकतो याच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसिद्ध कॅमेरामेन देबु देवधर यांच्या हाताखाली लाइट्मन म्हणून काम केलेला . . . त्या दरम्यान दारूच व्यसन लागल. . व्यसनाच्या इतका अधीन गेला की होत नव्हत ते सार काही दारुत घाळवुन बसला मग सुरू झाली आयुष्याची वाताहत. . . जवळचे कोणीच राहील नाही. . .सोबतीला उरली ती फक्त हाता पायांची थरथर आणी एकटेपण. . .सगळा अंधकार झाला होता जीवनात . . . . त्या क्षणी एक आवाज आला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." . . .गर्द अंधारात एक आशेचा किरण मिळाला मग सुरूवात झाली नव्या आयुष्याची. गुरू मार्ग सापडला अन् त्यामुळे जगाकडे , जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. . . नवी उमेद मिळाली. . . आध्यात्मीक चमत्कार यापेक्षा वेगळा काय असु शकतो??? स्वामींना गुरू मानून त्यांच्या ओढीने थेट अक्कलकोट गाठल. . . अन्नछत्रा बाहेर भाविकांच्या चपला सांभळन्याची जबाबदारी घेतली . . .त्याचा मोबदला म्हणजे फक्त दोन वेळेच जेवण. . . सेवाभावी वृत्तीने हा प्रवास सुरू झाला. . .जसे दिवस सरत गेले तशी दारू पण सुटली. . अश्यातच मग त्याने स्वतःचे हे अनुभव शब्दबद्ध करायला सुरूवात केली. . .हे सार लिखाण झाल पादत्रान कक्षात . . स्वामिंच्या दारी अश्यातच अजुन एक चमत्कार झाला . . नागपूर येथील प्रकाशण संस्थेचे संचालक अन् स्वामी भक्त प्रदीप मुळे तिथे दर्शानाला आले असताना चर्चेत कुठेतरी या लिखाणाविषयी समजल अन् त्यानंतर जन्माला आल एक आगळ वेगळ पुस्तक " चप्पलवटा ".या पुस्तकात त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्यात आलेले आहे. ही कथा आहे विवेक कळके यांची . . .हा प्रवास आहे एक दारुडा ते स्वामी सेवेकरी असा. . आता त्यांनी ठरवल आहे की राहिलेले आयुष्य स्वामी चरणीच व्यतीत करायच.
मला नाही वाटत चमत्कार याहून वेगळा काही असु शकेन. . . अध्यात्म माणसाच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतो. . जर सर्वांनीच गुरू मार्गाने वाटचाल केली तर आयुष्याच नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. . . ज्ञानेश्वर माउली , तुकाराम महाराज यांनी जो काही मार्ग दाखवला आहे तो जर अनुसरला गेला तर माणूस सुखी व्हायला अन् ह्या जगात शांती नांदायला वेळ लागणार नाही.
मागील आठवड्यात याविषयी लोकमतने दखल घेत बातमी प्रसिद्ध केली आहे.

1 comments:

संकेत आपटे said...

वाचायला हवं हे पुस्तक...